Thursday, March 26, 2015

मी आणि मराठी आकडे...

      खूप वर्ष झाली मी English बरोबरच मराठी ब्लॅक लिहिते आहे. English माध्यामात शिकल्यामुळे मराठी मध्ये ब्लॅक लिहिणे माझ्या साठी अजिबात सोपं नव्हंतं. मी आज English इतकच मराठी वाचते ह्याचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं. पण... मी मराठी वाचत असले तरी मला आजही मराठी मध्ये आकडे वाचता येत नाहीत. ते मी आजही English मध्येच वाचंते. उदा. “भारताने One hundred and twenty धावांनी विजय मिळवला”. ह्यात चूक माझी नाही आहे. कसं ते मी सांगते.
आपण देवनागरी अथवा English लिपी ही डावीकडून उजवीकडे अशी लिहितो. मात्र मराठी आकडे वाचताना हा नियम मोडीस निघतो.
उदा. ४५ - पंचेचाळीस
    ५ – उजवीकडचा आकडा मग
    ४ – डावीकडचा आकडा
ह्याला चाळीसपंचे असं का बरं नाही म्हणत?
मी आईला ह्याचं कारण विचारलं असंता आई म्हणाली, “पाच हे चाळीस मध्ये घातलें जातात, म्हणून पंचेचाळीस”
मग – पाच चाळीस मध्ये घालण्या वेजी चाळीस + पाच असं सोपं नाही का?

एकम्‌ - दशम्‌ ह्या क्रमानुसार एकम्‌ आकडा प्रथम वाचून मग दशम् आकडा वाचत असतील अशी मी स्वत:ची समजूत घातली. पण मग शतम् आकडा आला की त्याचा क्रम एकम् - दशम् - शतम् असा होत नाही. आधी शतम् मग एकम् आणि मग शेवटी दशम्. म्हणजे ’आधी डावीकडील आकडा मग एकदम उजवीकडील आकडा आणि शेवटी मधला आकडा’
उदा. ९४५ – नऊशे पंचे चाळीस
     ९ – एकदम डावीकडील आकडा (शतम्)
     ५ – एकदम उजवीकडील आकडा (एकम्) आणि शेवटी
     ४ – मधला आकडा (दशम्)
मग पंचे चाळीस ह्या एकम् दशम् नियमाप्रमाणे एकम् दशम् शतम् असाच क्रम ठेऊन ह्याला
पंचे चाळीस नऊशे असं म्हटलं पाहेजे.

अता अजून एक आकडा वाढवूया. सहस्र
१९४५ ह्याला एक हजार नऊशे पंचे चाळीस अथवा
एकोणीसशे पंचे चाळीस असं म्हणतात.
म्हणजे ह्याचा क्रम सहस्र – शतम् - एकम् - दशम्
दशम् च्या पुढे आकडे गेले की ते डावीकडून उजवीकडे वाचले जातात ते शतम् पर्यंत, शतम् नंतर परत आधी एकम् मग दशम् क्रम येतो.

      तसंच २९,३९,४९,५९,६९,७९,८९,९९ ह्या आकड्यांचं. English मध्ये ह्याला twenty nine, thirty nine, forty nine etc. असं साध सरळ म्हणतात. मराठीत ह्याला एकोणतीस, एकोणचाळीस, एकोणपन्नस इत्यादी म्हंटले जाते. मग सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस ह्या प्रमाणे ह्याला नऊवीस अथवा नव्वावीस का नाही म्हणत? नव्वावीस, नव्वातीस, नव्वाचाळीस असं असायला पाहीजे होतं.
ह्याचं उत्तर असं –
२९ - तीस ला एक ऊणे (कमी) म्हणून एकोणतीस.
३९ – चाळीस ला एक ऊणे म्हणून एकोणचाळीस
मग २८ ला तीस ला दोण ऊणे म्हणून दोणऊणेतीस
    ३८ ला दोनऊणेचाळीस इत्यादी का नाही म्हणत?

      मुंबईत असताना मी ह्या गोष्टीचा एवढा विचार केला नव्हता. पण पुण्यात आल्यापासून मराठी आकड्यांशी जास्त संबंध आल्यामुळे मनात गोंधळ उडाला. ह्याला उपाय म्हणून मी स्वत:चीच अशी एक मराठी आकडे लिहिण्याची शैली शोधून काढली. पुण्यात कुणाला phone no विचारला की ते सांगतात, “नऊशे पंचे चाळीस एक्क्याण्णव त्र्याऐंशी सहाशे पन्नास
मी असं लिहीते –:
नऊशे पंचे चाळीस -
नऊशे – (९ _ _)
पंचे – (९ _ ५)
चाळीस – (९ ४ ५)
एक्क्याण्णव
एक्क्या (एक) – (_ १)
ण्णव (नऊ) – (९ १)
त्र्याऐंशी –
त्र्या – (_ ३)
ऐंशी – (८ ३)
सहाशे पन्नास –
सहाशे – (६ _ _)
पन्नास – (६ ५ ०)
म्हणजे ९४५९१८३६५०

      अर्थात ह्या माझ्या शोधाचा मीच कमित कमी वापर करते. कारण हे सुद्धा तितकच गोंधळून टाकणारे, तेवढच complicated आहे. मग कुणी नऊशे पंचे चाळीस अशी सुरवात केली की मी लगेच विचारते, “Nine Four Five पुढे...” मग ते एकतर एक-एक मराठी आकडा सांगतात किंबहूना सरळ English मध्ये सांगतात.

      लहान असतानाची एक गोष्ट मला आठवते. माझ्या वडिलांचे एक सिंधी मित्र होते. त्यांनी एकदा phone केला आणि विचारले, “पाचशे पासष्ट अकरा एकोणसत्तर?” मी सरळ Wrong no म्हणून मोकळी झाले. पलिकडून ते म्हणाले, “Five six five double one six nine?” मी म्हंटलं हो! ते म्हणाले अगं मी हेच मराठीतून विचारलें होते.

      मला ह्या बाबतीत राहुलचं कौतुक वाटतं. तो सुद्धा English medium मध्ये शिकला आहे. पण कामाच्या ठिकाणी आणि अता business मध्ये त्याचा वर्कर लोकांशी संबंध येत असतो. त्यांना अजीबात English numbers समजत नाहीत. म्हणून (deliberately) प्रयत्नपूर्वक राहुल मराठी आकडे बोलायला लागला आणि शिकला. आता तो अस्खलीत मराठी मध्ये मोठे आकडे वाचू, लिहू आणि बोलू शकतो. मला तशी गरज कधी भासली नसल्याने, मी मराठी आकडे कधी शिकणार कोण जाणे.

२६-०-२०१५

Monday, March 11, 2013

अग आई आणि अहो आई. - एक गमतीदार किस्सा...


                           अग आई आणि अहो आई.
-                                                                                                                           -   एक गमतीदार किस्सा...

लग्ना नंतर 'अहो आई' म्हणायची मला स्वत:ला सवयच लावून घायला लागली असं म्हणायला हरकत नाही. 'अहो आई', 'तुम्ही' वगैरे माला बोलायला तसं अजूनही जडच जातं. आई अशी हाक मारताना 'ए आई sss', 'ए आई ग sss', 'अग आई ग sss' असच हक्काने तोंडी येतं. हक्क! खरच आपल्या आईवर आपला केवढा हक्क असतो. घरात सगळ्यांनीच  ‌‌‌गृहीत धरलेली व्यक्ती म्हणजे आई. 

माझी 'अग आई' नोकरी करत असल्या मुळे मला आणि ताईला कामाची अगदीच सवय नव्हती असं नाही. आयत ताट हातात मिळत नसलं, तरी सगळा स्वयंपाक करायला, अथवा घरचं काही संपलं आहे/नाही हे  कधी बघायला लागलं नाही हे नक्की. लग्ना नंतर एकदम सगळ अंगावर पडल्यावर मात्र माझी सुरवातीला तारांबळ उडायची. राहुलला मात्र एकटं रहायची सवय असल्यामुळे, रात्री कामावरून येताना दूध आणणे इत्यादी गोष्टी त्याच्याच लक्षात असायच्या. मला मात्र फोडणी करताना आयत्या वेळी लक्षात यायचं की घरी मोहरी संतली आहे. अर्थात राहुलने कधीच त्या वरून माला टोमणे मारले नाहीत. मी आणि राहुल असे दोघेच राहत असल्या मुळे आम्हाला काहीही backup नव्हता. पण कदाचीत त्यामुळेच चुका झाल्या तरी फार काही वाटायचं देखील नाही. कारण जेवणारे आम्ही दोघचं. उकडलेल्या बटाट्याची भाजी, काचऱ्याच्या भाजी सारखी तीखट घालून पण मी बनवली आहे. कारण त्या दिवशी घरी मोहरी होती, पण मिरच्याच संपल्या होत्या. असेच चुकत चुकत मी शिकत होते. ह्या सगळ्यात भर म्हणून की काय, घरी अजून कामवाली बाई मिळाली नव्हती. त्यामुळे, स्वयंपाक करणे, काय संपलं आहे/नाही हे बघणे, भांडी घासणे, केर-लादी हे सगळं आम्ही दोघं मिळून करत असू.

तर असं सगळं सुरळीत? चालू असतानाचं लग्ना नंतर साधारण २ महिन्यानी आमच्या अहो आई, म्हणजेच माझा सासूबाई आणि सासरे आमच्याकडे रहावयास आले. तो पर्यंत कामाची तशी सवय लागायला लागली होती. तरी कधीतरी गडबड ती व्हायचीच. त्यात सासूबाई पहिल्यांदाच रहावयास आल्या कारणाने त्यांच्यावर impression मारणं आलंच J J. मी जिद्दीने आणि प्रेमाने सगळं केलं देखील. आणि ते सुद्धा न चुकता. त्यांना काही म्हणजे काही करायला अथवा बघायला लागलं नाही हे विशेष. मला स्वत:लाच समाधान वाटलं. त्यांना पण आराम वाटला.

त्या नंतर काही दिवसानी माझी अग आई, नाना, ताई, जिजू आणि अहना असे सगळे अमच्याकडे आले. मी अहनाच्या आवडीचा बटाट्यांच्या परोठ्यांचा बेत आखला होता. इतर सगळ आई, नाना येईपरीयंत मी तयार करून ठेवलं होतं. परोठे तेवढे करायचे बाकी होते. आई लगेच म्हणाली, "तू सगळं केलं आहेस, आता परोठे मी करते". मी लगेच म्हणाले, "बर चालेल". असचं राहुलची आई, म्हणजेच माझ्या आहो आई पण म्हणायच्या. तेव्हा मी त्यांना म्हणायचे, "नाही, नको! मी करीन. तुम्ही आराम करा... वगैरे वगैरे".

हे माझ्याकडून इतक्या सहजतेने घडलं की मी असा फरक केलेला माझा लक्षात देखील आला नाही. राहुलने माला जेव्हा सांगीतलं तेव्हा माझा हे लक्षात आलं. तो म्हणाला, "कसली हरामखोर आहेस! सासू ला म्हणते मी करते, मी करते. आणि आईला कामला लावतेस". खंरच! आता तसं बघता आई आणि माझ्या सासूबाई एकाच वयाच्या. पण मी आईला गृहीत धरले. किती सहजतेने अथवा अनवधानाने असा फरक आपल्या हातून घडून जातो ह्याची मला गंमत वाटते. हे मी माझा अग आईला सांगीतल्यावर ती म्हणाली, “असच असतं! तुझ्या सासूबाई कधीतरीच तुमच्या कडे येणार, तेव्हा तू त्यांना काम करायला का सांगणार आहेस”. माला पटलं. पण मग माझी आई देखील कधीतरीच तर येते माझ्या कडे?

मला हसू आले आणि गंमत देखील वाटली. कदाचित आईला असं गृहीत धरलेलंच आवडत असेल. अथवा मी मुलगी म्हणून आईला असं ग्रुहीत धरण्याचा माझा हक्कचं आहे!

Sunday, July 01, 2012

राणीसाहेब...


आज राणीसाहेबांचा काही वेगळाच थाट होता. सकाळी त्यांनी आपल्या अलिशान पलंगावरूनच डोळे
किलकिले करून घरात चालू असलेल्या धावपळीचा अंदाज घेतला. तसं त्यांच घरात अगदी बारीक
लक्ष असे. कागदाचा छोटासा कपटा सुद्धा त्यांच्या दृष्टीस पडला की त्या अस्वस्थ होत असत. मग
कधी तो स्वत: उचलून त्याची विेल्हेवाट लावत असत. नाहीतर इतरांना करायला लावत असतं. आज मात्र त्यां कागदाच्या कपट्याचा त्यांना त्रास होत नव्हता. आज त्यांना कसलाच त्रास होत नव्हता.

आपल्या पलंगावरूनच आज त्या सगळ्या घाराचा कारभार बघत होत्या. घरातल्या इतर व्याक्तिंच्या 
धावपळीकडे मात्र त्या चोख लक्ष ठेवून होत्या. आज जेवायला आपल्याला काय हव, कय नको ह्याची 
यादी त्यांनी जवळपास सगळ्यांनाच पडल्या पडल्या सांगितली. राणीसरकारांची जेवणाची फ़्रर्माईश 
आज काही वेगळीच होती. राणीसाहेबांचा हुकूम ऎकून घरातील लोकांची अगदी धावपळच उडाली. 
सगळे तयारीला लागले.

आजचा दिवस खरच राणीसरकारांसाठी कहितरी वेगळा होता. सकाळी लवकर उठून अंघोळ करुन तयार होणाऱ्या राणीसरकार १०.०० वाजून गेले तरी उठण्याचे नाव घेत नव्हत्या. त्यांच्या तब्बेतीची चिंता जरा घरच्यांना लागली. पण आजरी असल्याची काहिच चिन्ह नव्हती. मग आज राणीसरकारांना झालय तरी कय? हा प्रश्न घरातीन सगळ्याच मंडळींना सतावत होता. पण राणीसरकारांना आज त्याची पर्वा नव्हती.

सकाळी उठल्या पसून बडबड करून सगळ्यांना कामाला लावणाऱ्या राणीसरकार आज मात्र कुणाशीच 
कहिही बोलत नव्हत्या. घारातील मंडळी आपल्या पलंगाजवळ येऊन मुद्दाम आपल्याशी कहीतरी 
बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे त्या ओळखून होत्यी. आज त्यांच कुठे आणि काय विनसलं हेच 
कुणाला समजत नव्हत. कुणी बोलायला येत आहे हे पाहून त्या सरळ कुस बदलून परत झोपल्याचं 
नाटक करत होत्या.

पडल्या पडल्या त्या इतर लोकांची धावपळ मात्र बघत होत्या. घरच्यांच्या सगळ्यांच्या अंघोळी झाल्या 
तरी त्या अजून झोपूनच होत्या. आज त्यांना स्वत:च आवरण्याची कसलीच घाई दिसत नव्हती. 
घरातील वळदळीकडे त्यांचं लक्ष जरी असलं तरी आज अपणहून त्यांनी कुणाची चैकशी सुद्धा साधी 
केली नाही. साफ सफाई करण्यासाठी येणाऱ्या मावशींन पासून ते शेजार पाजरच्या बायकांची त्या 
आपणहून चौकशी करत असतं. आज त्यांची अपुलकीने चौकशी करण्यासाठी सुद्धा राणीसरकारांनी 
आपला पलंग सोडला नाही. सगळ्यांनाच चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. आज राणीसरकांनी 
जवळ जवळ सगळ्यांशी अबोलाच धरला होता म्हणा नं.

एरवी लवकर उठून आंघोळ करून त्या देवाचं म्हणायला बसत असत. देवाला धूप दाखवून त्या 
घंटानाद जेव्हा करतात, तेव्हा सगळ घर प्रसन्न होतं. आज देवाला पण चुकल्या चुकल्या सारख 
वाटत असणार हे नक्की. 

स्वयंपाघरात तर त्या जातिने लक्ष घालत असतं. आज कुठली भाजी शिजते आहे, पोळ्या कशा होत
आहेत, हे त्या अगदी जातिने बघत असत. आज मत्र काहितरी वेगळच घडत होतं. जणू आज 
सगळ्याच कामकाजला सुट्टी होती त्यांच्या.

हो खरच! आज खरच सुट्टीचा दिवर होता. आमच्या राणीसरकारांचा नव्हे, राणिसरकारांच्या आईचा. 
आज राणीसरकारांच्या आईचा ‘Weekend’ होता आणि म्हणून राणीसरकार पण खूश होत्या. आज 
त्यांना आईने लवकर उठून अवरण्याची कसलिच घाई केलेली नव्हती. आईने आज लवकर उठवले 
नाही म्हणजे आज आई घरी आहे हे अमच्या राणीसरकारांनी, म्हणजेच माझ्या २ वर्षाय भाची 
अहनाने चांगलच ओळखलं होतं. एरवी ७.३० - ८.०० ला उठणारी अहना, आईच्या weekend च्या 
दिवशी हमखास लवकर उठत असे आणि आईला उठवून म्हणत असे, “आई उठ! अहनाची सकाळ 
झाली.”

एरवी सगळीकडे तुरूतुरू पळून, आंगापक्षा मोठा झाडू घेउन आख्ख घर झाडून काढणाऱ्या अहनाने 
आज सगळ्याला सुट्टी दिली होती. सकाळ पसून राणीसरकारांनी काही खालं नाही, ह्याने 
राणीसरकारांची आईच जस्त अस्वथ झाली होती. “आज मनीमाऊने सांगितल्या प्रमाणे छान
बटाट्याची भाजी केली आहे. मग अहना आज छान भाजी पोळी खाणार का?” ह्या प्रश्नाने मात्र
राणीसरकारांचा अबोला तुटला. “अहनाला दु-दु हव” अशी फर्माईश त्यांनी दिली. “ बरं! मग अहना
आज कपानी दुध पिणार आहे का? आई सारखी.” ह्या आईच्या बोलण्याला मात्रा राणीसरकाराने जरा घुश्यातच उत्तर दिलें, “अहनाची बाटली काऊने नेली. काऊ दादा अहनाची बटली दे. असं काय करतोस?” अस म्हणून तोंडात बोट घालून, कुस बदलून त्या परत लोळत पडल्या. 




Thursday, September 22, 2011

आईच्या स्वप्नात आला अमिताभ बच्चन...

हो! हे खरं आहे. अगदी १०० टक्के खरं. काल आईच्या स्वप्नात चक्क अमिताभ बच्चनजी आलेले म्हणे. आणि आईला चक्क ते स्वप्ना आठवत आहे. आमच्या कडे मुळात बॉलीवूड चं वेड कुणालाच नाही. मी स्वतः शेवटचा पिक्चर कोणता आणि कधी बघितला हे पण मला आठवत नाही. अमुक एक पिक्चर चांगला आहे असं समजल्यावर मी ठरवते की किमान तो पिक्चर तरी multiplex मध्ये जाऊन बघायचाच. पण मी तो पिक्चर बघायला जाण्याचा मुहूर्त निघण्या आधीच तो पिक्चर multiplex च्या बाहेर गेलेला असतो. सांगायचं तात्पर्य असं की माझी अशी स्थिती तर माझी आई movies, cinema, बॉलीवूड, हॉलिवूड, ह्या बाबतीत किती अरसिक असेल ह्याचा अंदाज तुम्हाला येईल. आईला आवडतात ती ' जूनी गाणी'. लता मंगेशकर, आशा भोसले, मन्नाडे, रफी, किशोर कुमार ह्यांची गाणी आम्ही कितीही वेळा एकू शकतो. पण कुणा एका hero बद्दल ची craze नाही. आई ला तर त्याहून नाही. असं असताना, आईच्या स्वप्नात अमिताभजी यावेत हे महा आचर्याची गोष्ट आहे. अमिताभ बच्चन, अमीर खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, कत्रिना कैफ, ऐश्वर्या राय इत्यादी मंडळींची एकदा तरी भेट होऊदे, अगदी प्रतेक्ष नाही तरी किमान ते स्वप्नात तरी दिसुदेत अशी कित्ती लोकांची अपेक्षा असते. आणि अशी मंडळी माझा आईचा स्वप्नात आली तर काय होतं वाचा........

आमच्या घरी कसलस तरी function होता आणि त्या function साठी अमिताभजी आले होता. अर्थात आमच्या घरी अमिताभजी आले आहेत हि गोष्ट ऐश्वर्या pregnant आहे ह्या NEWS इतकीच काही क्षणात सगळीकडे हा हा म्हणता पसरली. आणि हा हा म्हणता आमच्या घरी लोकांची गर्दी जमू लागली. आईने वैतागून मग अमिताभजी ह्यांना आमच्या आतल्या खोलीत लपवून ठेवलं. आणि अमिताभजी ह्यांच्या fans ला सांगितलं,"अमिताभ आजकाल असा लोकांकडे येत जात नाही फारसं. तो आला कि खूप गर्दी होते न... कधीतरी अचानक येऊन जातात तो , म्हणजे कुणाला समजत नाही". असं सांगून आईने त्या येणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. बिच्चारे.

आईच्या त्या स्वप्नात fans पेक्षा बिच्चारी अवस्था होती ती अमिताभजी ह्यांची. कारण असं लपून बसून कंटाळा आल्याने त्यांनी मग आमच्या सगळ्यांसाठी मस्त पेकी चहा बनवला. आता एवढ्या मोठ्या कलाकाराने आमच्या साठी चहा बनविलेल बघून आईने सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. आई काय खाऊ घालणार होती हे तिला आठवत नाही. पण कसं आहे... आम्ही सगळे, म्हणजे मी, आई, बाबा, ताई सगळ्यांची उंची बेताचीच. आईला तर कधी कधी ह्या कमी उंची चा भयानक त्रास होतो. म्हणजे हेच बघा. आपण 'न लागणाऱ्या वस्तू’ कपाटाच्या अगदी वरच्या कप्यात ठेवतो. छानसा dinner set असो वा सतत न लागणारी वस्तू असो त्या जपून वरच्या कप्यात ठेवल्या जातात. आता अमिताभजी चक्क आले आहेत म्हंटल्यावर आईला कदाचित त्यांच्या साठी 'तो' छानसा नवा (नवा = न वापरलेला १०~१५ वर्ष जूना) dinner set काढायचा असेल. आता एवढ्या वरती तो जपून ठेवलेला dinner set काढायचा म्हणजे आईला शिडीवर अथवा खुर्चीवर चढणं आलेच. आईने मग चक्क अमिताभ जी ह्यांना हाक मारली व म्हणाली, "उंची मुळे केवढा फायदा होतो हो तुम्हाला, मला जरा तो वरचा डब्बा आणि तो छानसा dinner set काढून द्या." आईनी हे सांगितल्या वर मात्र मी खो खो हसायला लागले आणि मनात आलं, "कुणाला कश्याचं काय तर कुणाला कश्याचं काय".

Monday, September 12, 2011

गणपती विसर्जन - पुणे मुंबई मधील तफावत....

मी एक अस्सल मुंबईकर. माझा जन्म, शिक्षण सगळं मुंबई मधे झालेलं. सध्या काही वर्ष मी पुण्यात स्थाईक झाले आहे. असं म्हणतात कि मुंबई चा माणूस पुण्यात adjust होऊ शकत नाही. त्याला fast life ची इतकी सवय झालेली असते की पुण्यातली शांतता त्याला खायला उठते. हे थोड्याफार प्रमाणात खरं असेलहि पण पुण्याची भुरळ एकदा पडली की पुणेकर होण्यातली मजा त्याला समजते. मुंबईत पाऊस म्हटलं की अंगावर काटा येतो तसच पुण्यात प्रवास म्हंटला की तो नकोसा होतो. मुंबईत सुविधांना पुण्याचा सुंदर वातावरणाची तोड जरी नसली तरी मुंबईचा समुद्राचा अभाव पुण्याला जाणवतो. थोडक्यात काय तर दोन्ही मध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत. काहीतरी वाटत पुण्याची थंड हवा मुंबई ला export करावी आणि मुंबईची transportation facility पुण्यात आणावी. अर्थात हे स्वप्न आहे. फक्त स्वप्न. असो

मला अनेक जण विचारतात, "पुणे छान की मुंबई"? मुंबईत शिस्त आहे तर पुण्यात एक सुंदर इतिहास आहे. . पुण्यात मराठमोळ वातावरण आहे तर मुंबईत cosmopolitan ची विविधता आहे. आपापल्या परीने दोन्ही आपापल्या जागी छान आहेत.

एक मोठ्ठा फरक मला कोठे जाणवला असेल तर तो गणपती विसर्जनात. बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ साली पुण्यात "केसरीवाडा" सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना करून खर्या अर्थाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केले. गणेश उत्सव खरतर महाराष्ट्रा मधे जास्त करून साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पुण्यात त्या मुलेच की काय खर्या अर्थाने गणेश उत्सव साजरा केला जातो असं मला वाटत. मी आज मुंबईचे गणपती उत्सव आणि पुण्यातील गणेश उत्सव दोन्ही जवळून पहिले आहेत आणि म्हणून मी आज ठाम पणे हे सांगू शकते की पुण्यात अजूनही साजेसा गणेश उत्सव साजरा केला जातो. पुण्यातल्या काही गणेश मंडळांना 'धिंगाण्या' चे स्वरूप जरी आले असले तरी अजून मनाचे गणपती अजूनही आपली शान आणि शिस्त सखून आहेत.


मुंबईत कोणताही कार्य असो अख्खी मुंबई 'बॉलीवूड' च्या तलावात थिरकते. गणपती विसर्जनाचा पण तेच आहे. त्या विसर्जनाला लय असतो ताल. असतो तो नुसता धिंगाणा. एक हात वरती उचलायचा आणि कोणत्यातरी बॉलीवूड च्या गाण्यावर एक एक पाय उचलायचा की झाला dance. मग आपण गणपतीला कोणती गाणी वाजवत आहोत ह्याचा काहीही भान नाही. शीला की जवानी पासून ते मुन्नी अश्या गाण्यावर मुंबईत गणेश विसर्जन होते. लालबाग च्या राजाचा थाट मुंबईत जरी मोठ्ठा असला तरी विसर्जनाची अवस्था तीच. मधूनच मग कोठेतरी मराठमोळी फुगडी घालताना काही बायका मुली नजरेस पडतात पण एक - दोन फुगड्या झाल्या की परत एक हाताचा dance चालू होतो. मुंबईला एकाच धोरण माहिती आहे, "पैसा फेक, तमाशा देख". मग कोणताही सण असो लाखा लाखांचे फटके उडवायचे, तेवढ्याच किमतीचा गुलाल उधळायचा आणि एक हात वर करून चित्र विचित्र नाचायचे.

ह्या उलट चित्र बघायला मिळत ते पुण्यात. ढोल - ताश्या च्या गजरात गणरायाचं विसर्जन होतं. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी कधी नव्हे ते पुणेकर शिस्ती पालन करताना मी ह्या ची डोळा ह्याची देही पहिले आहे. गणपती विसर्जनाच्या ढोल पथकाची तालीम एक दीड महिना आधी पासून चालू होते. तालीम करताना ढोलाचे स्वर कानावर पडतात आणि जणू काही ते स्वर गणरायाच्या आगमनाची वरात घेऊन येतात असं वाटते. त्या ढोल ताश्या पथकाच्या तालामिनेच वातावरण प्रफुल्लीत होऊन जाते.Ganesh Visarjan - Pune

पुण्याचे ठरलेले मानाच्या गणपतीचे आधी विअर्जन होते. ही पद्धत फार पूर्वी पासून ते आजतागायत चालू आहे. पहिला निघतो तो 'कसबागणपती' -श्री विनायक ठाकर ह्यांचा घराजवळ ही गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी तेथेच त्याची स्थापना केली. पुण्याचा ग्रामदेवता म्हणून ह्या गणपतीचा मन मोठा आहे.

दुसरा मानाचा गणपती म्हणजे 'तांबडी जोगेश्वरी'. आफ्रिकेतल्या हत्ती सारखी दिसणाऱ्या ह्या मूर्तीची मिरवणूक नेहमी चांदीचापालखीतून निघते.

तिसरा मन आहे 'गुरुजी तालीम' गणेश मंडळाचा. ह्याची स्थापना १८८७ रोजी झाली. हिंदू-मुसलमान ह्यांच्या एकी साठी ह्यागणपतीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

चौथा मन आहे 'तुळशीबाग' ह्या गणपतीचा. श्री. खटावकर ह्यांचा हस्ते दर वर्षी ह्या तुळशीबागेलाल्या गणरायाची स्थापना केलीजाते. ह्याचा वैशिठ म्हणजे दरवर्षी ही मूर्ती fiber glass पासून बनवली जाते.

पाचवा मानाचा गणपती म्हणजे 'केसरीवाडा'. ह्या गणपती पासूनच बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ रोजी सार्वजनिकगणेशउत्सव ची स्थापना केली. पुण्यात ह्या मानाचा गणपतींचे विसर्जन आधी होते आणि मगच इतर गणेश मंडळ आपल्या मूर्तींचे विसर्जन करतात.

ह्या मानाचा गणपतींची विसर्जन मिरवणूक बघण्या सारखी असते. रस्त्याचा दोन्ही बाजूला रांगोळी काढल्या जातात. पहिला मानाचा गणपती 'कसबा गणपती' ची मिरवणूक सर्वात पहिले निघून त्याचाच साधारण . ला विसर्जन होते.

ह्या सगळ्या मानाच्या गणपतीचा विसर्जन ढोल - ताश्याच्या गजरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घडते. कोठेही गोंधळ नाही,गडबड नाही. कोठेही देवाचा नलाखाली धिंगाणा नाही. "गणपती माप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" असे गात एक सुंदर अश्या लयबद्ध तालात ह्या गणपतींचे विसर्जन होते.

पुण्यातील ह्या मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले की मात्र मुंबई सारखा धिंगाणा येथे पण चालू होती. मग बॉलीवूडच्या गाण्यावर येथल्या पण लोकांचे पाय थरारतात. एवढ्या उत्कृष्ट ढोल - ताश्याच्या तालानंतर ही गाणी एकूण गणपती बाप्पा सुद्धा आपले सुपेवढे कान बंद करून घेत असेल हे नक्की.