Thursday, September 22, 2011

आईच्या स्वप्नात आला अमिताभ बच्चन...

हो! हे खरं आहे. अगदी १०० टक्के खरं. काल आईच्या स्वप्नात चक्क अमिताभ बच्चनजी आलेले म्हणे. आणि आईला चक्क ते स्वप्ना आठवत आहे. आमच्या कडे मुळात बॉलीवूड चं वेड कुणालाच नाही. मी स्वतः शेवटचा पिक्चर कोणता आणि कधी बघितला हे पण मला आठवत नाही. अमुक एक पिक्चर चांगला आहे असं समजल्यावर मी ठरवते की किमान तो पिक्चर तरी multiplex मध्ये जाऊन बघायचाच. पण मी तो पिक्चर बघायला जाण्याचा मुहूर्त निघण्या आधीच तो पिक्चर multiplex च्या बाहेर गेलेला असतो. सांगायचं तात्पर्य असं की माझी अशी स्थिती तर माझी आई movies, cinema, बॉलीवूड, हॉलिवूड, ह्या बाबतीत किती अरसिक असेल ह्याचा अंदाज तुम्हाला येईल. आईला आवडतात ती ' जूनी गाणी'. लता मंगेशकर, आशा भोसले, मन्नाडे, रफी, किशोर कुमार ह्यांची गाणी आम्ही कितीही वेळा एकू शकतो. पण कुणा एका hero बद्दल ची craze नाही. आई ला तर त्याहून नाही. असं असताना, आईच्या स्वप्नात अमिताभजी यावेत हे महा आचर्याची गोष्ट आहे. अमिताभ बच्चन, अमीर खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, कत्रिना कैफ, ऐश्वर्या राय इत्यादी मंडळींची एकदा तरी भेट होऊदे, अगदी प्रतेक्ष नाही तरी किमान ते स्वप्नात तरी दिसुदेत अशी कित्ती लोकांची अपेक्षा असते. आणि अशी मंडळी माझा आईचा स्वप्नात आली तर काय होतं वाचा........

आमच्या घरी कसलस तरी function होता आणि त्या function साठी अमिताभजी आले होता. अर्थात आमच्या घरी अमिताभजी आले आहेत हि गोष्ट ऐश्वर्या pregnant आहे ह्या NEWS इतकीच काही क्षणात सगळीकडे हा हा म्हणता पसरली. आणि हा हा म्हणता आमच्या घरी लोकांची गर्दी जमू लागली. आईने वैतागून मग अमिताभजी ह्यांना आमच्या आतल्या खोलीत लपवून ठेवलं. आणि अमिताभजी ह्यांच्या fans ला सांगितलं,"अमिताभ आजकाल असा लोकांकडे येत जात नाही फारसं. तो आला कि खूप गर्दी होते न... कधीतरी अचानक येऊन जातात तो , म्हणजे कुणाला समजत नाही". असं सांगून आईने त्या येणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. बिच्चारे.

आईच्या त्या स्वप्नात fans पेक्षा बिच्चारी अवस्था होती ती अमिताभजी ह्यांची. कारण असं लपून बसून कंटाळा आल्याने त्यांनी मग आमच्या सगळ्यांसाठी मस्त पेकी चहा बनवला. आता एवढ्या मोठ्या कलाकाराने आमच्या साठी चहा बनविलेल बघून आईने सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. आई काय खाऊ घालणार होती हे तिला आठवत नाही. पण कसं आहे... आम्ही सगळे, म्हणजे मी, आई, बाबा, ताई सगळ्यांची उंची बेताचीच. आईला तर कधी कधी ह्या कमी उंची चा भयानक त्रास होतो. म्हणजे हेच बघा. आपण 'न लागणाऱ्या वस्तू’ कपाटाच्या अगदी वरच्या कप्यात ठेवतो. छानसा dinner set असो वा सतत न लागणारी वस्तू असो त्या जपून वरच्या कप्यात ठेवल्या जातात. आता अमिताभजी चक्क आले आहेत म्हंटल्यावर आईला कदाचित त्यांच्या साठी 'तो' छानसा नवा (नवा = न वापरलेला १०~१५ वर्ष जूना) dinner set काढायचा असेल. आता एवढ्या वरती तो जपून ठेवलेला dinner set काढायचा म्हणजे आईला शिडीवर अथवा खुर्चीवर चढणं आलेच. आईने मग चक्क अमिताभ जी ह्यांना हाक मारली व म्हणाली, "उंची मुळे केवढा फायदा होतो हो तुम्हाला, मला जरा तो वरचा डब्बा आणि तो छानसा dinner set काढून द्या." आईनी हे सांगितल्या वर मात्र मी खो खो हसायला लागले आणि मनात आलं, "कुणाला कश्याचं काय तर कुणाला कश्याचं काय".

Monday, September 12, 2011

गणपती विसर्जन - पुणे मुंबई मधील तफावत....

मी एक अस्सल मुंबईकर. माझा जन्म, शिक्षण सगळं मुंबई मधे झालेलं. सध्या काही वर्ष मी पुण्यात स्थाईक झाले आहे. असं म्हणतात कि मुंबई चा माणूस पुण्यात adjust होऊ शकत नाही. त्याला fast life ची इतकी सवय झालेली असते की पुण्यातली शांतता त्याला खायला उठते. हे थोड्याफार प्रमाणात खरं असेलहि पण पुण्याची भुरळ एकदा पडली की पुणेकर होण्यातली मजा त्याला समजते. मुंबईत पाऊस म्हटलं की अंगावर काटा येतो तसच पुण्यात प्रवास म्हंटला की तो नकोसा होतो. मुंबईत सुविधांना पुण्याचा सुंदर वातावरणाची तोड जरी नसली तरी मुंबईचा समुद्राचा अभाव पुण्याला जाणवतो. थोडक्यात काय तर दोन्ही मध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत. काहीतरी वाटत पुण्याची थंड हवा मुंबई ला export करावी आणि मुंबईची transportation facility पुण्यात आणावी. अर्थात हे स्वप्न आहे. फक्त स्वप्न. असो

मला अनेक जण विचारतात, "पुणे छान की मुंबई"? मुंबईत शिस्त आहे तर पुण्यात एक सुंदर इतिहास आहे. . पुण्यात मराठमोळ वातावरण आहे तर मुंबईत cosmopolitan ची विविधता आहे. आपापल्या परीने दोन्ही आपापल्या जागी छान आहेत.

एक मोठ्ठा फरक मला कोठे जाणवला असेल तर तो गणपती विसर्जनात. बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ साली पुण्यात "केसरीवाडा" सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना करून खर्या अर्थाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केले. गणेश उत्सव खरतर महाराष्ट्रा मधे जास्त करून साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पुण्यात त्या मुलेच की काय खर्या अर्थाने गणेश उत्सव साजरा केला जातो असं मला वाटत. मी आज मुंबईचे गणपती उत्सव आणि पुण्यातील गणेश उत्सव दोन्ही जवळून पहिले आहेत आणि म्हणून मी आज ठाम पणे हे सांगू शकते की पुण्यात अजूनही साजेसा गणेश उत्सव साजरा केला जातो. पुण्यातल्या काही गणेश मंडळांना 'धिंगाण्या' चे स्वरूप जरी आले असले तरी अजून मनाचे गणपती अजूनही आपली शान आणि शिस्त सखून आहेत.


मुंबईत कोणताही कार्य असो अख्खी मुंबई 'बॉलीवूड' च्या तलावात थिरकते. गणपती विसर्जनाचा पण तेच आहे. त्या विसर्जनाला लय असतो ताल. असतो तो नुसता धिंगाणा. एक हात वरती उचलायचा आणि कोणत्यातरी बॉलीवूड च्या गाण्यावर एक एक पाय उचलायचा की झाला dance. मग आपण गणपतीला कोणती गाणी वाजवत आहोत ह्याचा काहीही भान नाही. शीला की जवानी पासून ते मुन्नी अश्या गाण्यावर मुंबईत गणेश विसर्जन होते. लालबाग च्या राजाचा थाट मुंबईत जरी मोठ्ठा असला तरी विसर्जनाची अवस्था तीच. मधूनच मग कोठेतरी मराठमोळी फुगडी घालताना काही बायका मुली नजरेस पडतात पण एक - दोन फुगड्या झाल्या की परत एक हाताचा dance चालू होतो. मुंबईला एकाच धोरण माहिती आहे, "पैसा फेक, तमाशा देख". मग कोणताही सण असो लाखा लाखांचे फटके उडवायचे, तेवढ्याच किमतीचा गुलाल उधळायचा आणि एक हात वर करून चित्र विचित्र नाचायचे.

ह्या उलट चित्र बघायला मिळत ते पुण्यात. ढोल - ताश्या च्या गजरात गणरायाचं विसर्जन होतं. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी कधी नव्हे ते पुणेकर शिस्ती पालन करताना मी ह्या ची डोळा ह्याची देही पहिले आहे. गणपती विसर्जनाच्या ढोल पथकाची तालीम एक दीड महिना आधी पासून चालू होते. तालीम करताना ढोलाचे स्वर कानावर पडतात आणि जणू काही ते स्वर गणरायाच्या आगमनाची वरात घेऊन येतात असं वाटते. त्या ढोल ताश्या पथकाच्या तालामिनेच वातावरण प्रफुल्लीत होऊन जाते.Ganesh Visarjan - Pune

पुण्याचे ठरलेले मानाच्या गणपतीचे आधी विअर्जन होते. ही पद्धत फार पूर्वी पासून ते आजतागायत चालू आहे. पहिला निघतो तो 'कसबागणपती' -श्री विनायक ठाकर ह्यांचा घराजवळ ही गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी तेथेच त्याची स्थापना केली. पुण्याचा ग्रामदेवता म्हणून ह्या गणपतीचा मन मोठा आहे.

दुसरा मानाचा गणपती म्हणजे 'तांबडी जोगेश्वरी'. आफ्रिकेतल्या हत्ती सारखी दिसणाऱ्या ह्या मूर्तीची मिरवणूक नेहमी चांदीचापालखीतून निघते.

तिसरा मन आहे 'गुरुजी तालीम' गणेश मंडळाचा. ह्याची स्थापना १८८७ रोजी झाली. हिंदू-मुसलमान ह्यांच्या एकी साठी ह्यागणपतीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

चौथा मन आहे 'तुळशीबाग' ह्या गणपतीचा. श्री. खटावकर ह्यांचा हस्ते दर वर्षी ह्या तुळशीबागेलाल्या गणरायाची स्थापना केलीजाते. ह्याचा वैशिठ म्हणजे दरवर्षी ही मूर्ती fiber glass पासून बनवली जाते.

पाचवा मानाचा गणपती म्हणजे 'केसरीवाडा'. ह्या गणपती पासूनच बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ रोजी सार्वजनिकगणेशउत्सव ची स्थापना केली. पुण्यात ह्या मानाचा गणपतींचे विसर्जन आधी होते आणि मगच इतर गणेश मंडळ आपल्या मूर्तींचे विसर्जन करतात.

ह्या मानाचा गणपतींची विसर्जन मिरवणूक बघण्या सारखी असते. रस्त्याचा दोन्ही बाजूला रांगोळी काढल्या जातात. पहिला मानाचा गणपती 'कसबा गणपती' ची मिरवणूक सर्वात पहिले निघून त्याचाच साधारण . ला विसर्जन होते.

ह्या सगळ्या मानाच्या गणपतीचा विसर्जन ढोल - ताश्याच्या गजरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घडते. कोठेही गोंधळ नाही,गडबड नाही. कोठेही देवाचा नलाखाली धिंगाणा नाही. "गणपती माप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" असे गात एक सुंदर अश्या लयबद्ध तालात ह्या गणपतींचे विसर्जन होते.

पुण्यातील ह्या मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले की मात्र मुंबई सारखा धिंगाणा येथे पण चालू होती. मग बॉलीवूडच्या गाण्यावर येथल्या पण लोकांचे पाय थरारतात. एवढ्या उत्कृष्ट ढोल - ताश्याच्या तालानंतर ही गाणी एकूण गणपती बाप्पा सुद्धा आपले सुपेवढे कान बंद करून घेत असेल हे नक्की.