Thursday, November 11, 2010

रुढी आणि परंपरा

असंख्य रुढी आणि परंपरा असलेला आपला हिंदू धर्म. लहान पणापसून आपल्यावर कळत नकळत त्या रुढी आणि परंपरां चे संस्कार होत असतात. काही परंपरेचें मला जितके कौतुक वाटते तितकेच अप्रुप पण वाटते.

अहनाच्या महिन्यांच्या वाढदिवसांना आई तिला ओवाळते व तिच्या डोक्यावर कापुस व दुर्वा ठेवत म्हणते, "कापुसा सारखी तू म्हातारी हो व दुर्वांसारखा तुझा वंश वाढुदे". आपल्या धर्मात जेवढा सखोल व सुक्ष्म विचार केला आहे, तसा विचार अजून कोणत्याही धर्मात केलेला नाही. कापुस कितीही झुना झाला तरी तो खराब होत नाही किंवा तो म्हातारा होत नाही. कितीही झुना झाला तरी कापसाचा उपयोग होतो, तो कधीही टाकाऊ व निरुपयोगी होत नाही, तशीच तू सुद्दा कापसा सारखी म्हातारी हो आणि तुझा जगाला कायम फायदा होऊदे. तातप~य तू सुद्दा चिरतरूण रहा. एका दुर्वा पसून अनेक दुर्वांचा जन्म होतो, तसाच तुझा वंश सतत वाढुदे. किती छान कल्पना आहे नाही. आणि त्यामागे किती अभ्यास आहे.

एक काळी टिट आपल वाईट नजरेपासून सौरक्षण करत असते. काही लोक ह्याचा अतिरेक करतात तो भाग वेगळा. ते लोक बाळाला एवढी टिट लावतात की ते बाळ अगदी कुरूप दिसायला लागत. मग त्याला नजर लागेलच कशी? मी काही वर्षापूर्वी ह्या टिट लावण्याच्या पद्दतिला हसत असे. त्याला मुर्खिपणा म्हणत असे. पण मावशी झाल्यापसून मी बदलले आहे. आपल्या गोंडुस बाळाला कुणाकुणाची नजर लागू नये असे वाटत असते. मी अहनाला आता टिटि लावल्याखेरीज कोठेही घेऊन जात नाही. आणि का कुणास ठाऊक, अहना सुद्दा टिट लावली असली की शांत असते व कधी टिट लावावयास विसरलो की ती हमखास घारी येऊन रडा रड करते. मग आई तिची द्रुष्ट काढते.

"द्रुष्ट - मिष्ट पापी चांडाळाची, भुता-केतांची, आल्या-गेल्याची, घरातल्या माणसाची - दारातल्या माणसांची -
बाहेरच्या माणसाची, पशु - पक्ष्यांची, झाडा - झुडप्यांची, किड्या - मुंग्यांची, द्रुश्य- अद्रुश्य शक्तिंची द्रुष्ट, जशी श्री कृष्णाची निघाली तशी आमच्या अहनाची निघुन जाउदे. ह्यात आपण आपल्या आजुबाजूला असलेल्या सगळ्या जीव-निर्जीव वस्तुंपासून आपल्या बाळाचे संरक्षण करत असतो. किती सुंदर कल्पना आहे नाही!
द्रुष्ट वाईटच असते अस नाही. खूप मनापसून, प्रेमाने केलेल्या तारीफेमुळे सुद्दा द्रुष्ट लागते. अता modern thinking प्रमाणे विचार केला तर आपण म्हणतो की आपण नेहमी positive vibes spread करावे. अता मला सांगा positive thinking किंवा positive vibes मिळाल्यामुळे आपल्या aura मधे बदल होतो व आपल्याला एक वेगळी प्रकारची energy मिळते हे आपण मानतो. मग आता त्या द्रुष्टीने द्रुष्ट काढण्याच्या पद्दतिकडे पहा. आपण directly, indirectly positive energy spread करत असतो. आपण एकाप्रकारे त्या बाळाल protection कवच घालत असतो. त्याच्या aura ला सगळ्यापासून रक्षण करत असतो, अस नाही का वातट.

आपल्या हिंदू संस्क्रुतित आपण लक्षीची जशी पूजा करतो तशी आपण झाडुची पण लक्षी समजून पुजा करतो. त्या मागचा हेतु हा की, लक्षी घरात आली की संम्रुद्धी जशी येते, तसच झाडू आपल्या घराची सफाई करुन घरा स्वच्छता ठेवते. म्हणुन आपण तीची लक्षी समजून पूजा करतो. शेवटी घर स्वच्छ असल्याखेरीज लक्षी त्या घरात नांदेलच कशी. लक्षीला पण प्रसन्न वातावरण आवडत अस माझी आई मला नेहमी सांगत असते. त्यामुळे घराची स्वच्छता करून घर निरोगी ठेवणा~या झाडूला सुद्दा आपल्या धर्मात स्थान आहे.

हिंदू, गो मातेची आई समजून पूजा करतात. जगात सगळ्यांना त्याच अप्रुप वाटत. मला एकदा एका जपानी माणसाने हसतच विचारले, "तुम्ही गाईला देव / आई का मानता?" आता त्याला पटेल अस आणि आपल्या हिंदू धर्माचे महत्व समजावून देणारे उत्तर देणे आवश्यक होते. मी त्याला म्हणाले, "लहान असताना आपण आईचे दुध पितो. तसेच मग मोठ झाल्यावर आईच्या दुधाला पर्याय म्हणुन आपण गाईच दुध पितो, म्हणुन आम्ही गाईला आई समजून तिची पूजा करतो." त्याला पण हे उत्तर पटल पण मग त्याचा पुढचा प्रश्न, "गाय म्हातारी झाली की ती दुध देत नाही. मग तिचा फारसा उपयोग पण होत नाही. मग गाय म्हातारी झाली की तिला तुम्ही मारुन खात का नाहीत"? बापरे, काय हा क्रुर विचार. मग मी त्याला विचारल, "तू आजून तुझ्या आईचे दुध पितोस का?" त्याला काही समजले नाही पण मग हसुन म्हणाला, "छे! आता मोठा झ्याल्यावर आईच दुध कोण पित का?" मग मी त्याला विचारल, "मग तरी तू तुझ्या आईला मारून खाल्ल नाहीस आहेस न? तसच आम्ही गाईला आई मानतो. मग तिने आपल्याला दुध देणे बंद केले तरी आम्ही तिला कस बर मारू. ती आई आहे आणि त्यामुळे कायम पुजनियच असेल". तो जपानी चपापलाच पण त्याला खरच आपल्या संस्क्रुतिची कमाल वाटली. तस त्याची पण चुक नाही. जपान हा कृषी प्रधान देश नाही. काही पिकत नसल्यामुळे सगळ्या प्राण्यांना देवाने आपल अन्न म्हणुनच ह्या प्रुथ्वी वर पाठवल आहे अशी समजूत तेथे आहे. आणि म्हणुन भारतात खूप लोक शाकाहारी आहेत व प्राण्यांची पुजा करतात ते त्यांच्या पचनीच पडत नाही.

दर दस~याला आम्ही निसर्ग प्रेमी मुंब्राला जातो आणि तिथे डोंगराची पुजा करतो. पाऊस असल्यामुळे आमच 'rock climbing' काही महीने बंद असत. मग आम्ही दस~याला त्या डोंगराची पुजा करतो व त्याला सांगतो की आता आम्ही तुझ्यावर परत चढाई करु, तर तू आमची काळजी घे! किती छान वाटत म्हणुन सांगू! आपण सकाळी ’कराग्रे वसते लक्षी करमद्दे सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनं॥ समुन्द्र वसते देवी पर्व स्तन मंडिते! विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पद स्पर्श क्षमस्व में॥" अस म्हणुन आपण पायाचा स्पर्श केल्याबद्दल / पाय लावल्या बद्दल आपल्या प्रुथ्वी मातेची माफी मागतो. तसच आम्ही डोंगराची पुजा करून त्याची आधी माफी मागतो आणि मग पुढच्या चढाई साठी त्याचे आशिर्वाद पण घेतो.

काही लोक ह्याला निव्वळ अंधश्रद्दा म्हणतील. पण विचार करता, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे आपल्या आयुष्यातील महत्व आपल्याला ह्यातून समजते व त्यासाठी आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करतो. अश्या आणि अश्या प्रकारच्या आनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या रुढी आणि परंपरा मधे असल्याचा मला अभिमान आहे!

Wednesday, October 27, 2010

"गु" ह्या शब्दाचा जपानी अर्थ - 具を入れてください。(गु ओ इरेते कुदासाई).

माझा एक जपानी मित्र भरत फिरायला आला असताना त्याने "सुशी" हा जपानचा प्रसिद्द पदार्थ भारतात मिळतो का ह्याची चैकशी माझ्या जवळ केली. मी त्याला मराठी भाषेत शी आणि सु [शू] चा अर्थ सांगितला. पुन्हा
तो पदार्थ खाताना त्याला सु - शी चा अस्सल मराठी अर्थ अठवला नाही तरच नवल.


मागील blog मधे मी "अहो!" ह्या शब्दाचा जपानी अर्थ "अहो ऎकलत का?" ह्या blog मधे सांगीतला होता. असच आता "गु"ह्या शब्दाचा जपानी अर्थ.

एकदा मी आणि माझ्या मैत्रिणी जपानी भाषेचा आभ्यास करत होतो. Japanese CD लाऊन आमचा आभ्यास चालू होता. Exam साठीची तयारी. CD ऎकायची आणि उत्तर शोधायचे. एकदा असच आम्ही "Japanese Cooking ची CD" ऎकत होतो. त्यात एक जपानी माणूस एक Japanese dish बनवत होता. मग त्यात त्या माणसाने कोणते पदार्थ घातले, किव्हा त्याला ती dish बनवायला किती वेळ लागला असे प्रश्र्न असयचे. त्यामुळे आम्ही सगळ्या जणी कान लाऊन ऎकत होतो.

Dish ची recipe आणि क्रुती सांगता सांगता तो माणूस मधेच म्हणाला, "具を入れてください。" [गु ओ इरेते कुदसाई]. आम्ही सगळ्या जणींनी एकमेकींकडे बघीतल. मी चुकीच तर काही ऎकल नव्हत ना! अशा अर्थी हा कटाक्ष होता. पण सगळ्याच जणिंनी काहीतरी हस्यास्पद ऎकले होते. आम्ही परत ती CD थोडीशी rewind करुन पुन्हा एकदा ऎकली. पण ह्या वेळीसुद्दा सगळ्या जणींना गु ओ इरेते कुदसाई असच ऎकायला आले आणि मग हस्याचा एकच स्पोट झाला. अख्खी Japanese Dictionary मधे cooking शी संदर्भ असलेला गु चा अर्थ सापडला नाही. 具 किव्हा गु ह्या शव्दाचा खरा Japanese अर्थ म्हणजे tool. पण मग cooking मधे तसा संदर्भ लागत नव्हता. मग खूप शोधल्यानंतर गु ह्या शब्दाचा अजून एक अर्थ सापडला. गु म्हणजे "Ingredients" अश्या अर्थी सुद्दा गु वापरला जातो.

"具を入れてください。" [गु ओ इरेते कुदसाई] म्हणजे "अता त्यात ’गु’ भरा". म्हणजेच आता त्यात तयार केलेले सारण भरा. आम्ही सगळ्या जणी पोड धरून हसायला लागलो. त्यात भर म्हणजे मी पटकन बोलून गेले, "ही Japanese लोक काहीपण खातात. आपण गु बाहेर टाकतो आणि ती ते सारण म्हणून आत टाकतात. शी sss!"

अश्या अनेक गमती-जमती नवीन भाषा शिकताना घडतच असतात. ह्या blog मधे ऎवढच.

Friday, October 22, 2010

न नरे नकारातला आणि न नरे नन्ना च्या पाढ्यातला

काही दिवसांपूर्वी माझ्या काही जवळच्या मैत्रिणींना मी फोन केले. आम्ही माझ्या मुंबईच्या घरी night stay करून मजा टाकण्याचा plan ठरवत होतो. अपेक्षे प्रमाणे सगळ्याजणींनी लगेच ह्या plan ला होकार दिला आणि भेटल्यावर काय काय करायच ह्याच planning आम्ही करायला लागलो. मैत्रिणी म्हटल की त्यात अनेक स्वभावाचे, अनेक रंगांचे, विविध आवडी निवडी असलेले असे सगळे आलेच. मग त्यातच असते "खो" घालणारी
एक मैत्रिण.

आमच्या एका मैत्रिणीचेही असेच काहीसे आहे. ’न नरे नकार’ आणि ’न नरे नन्ना चा पाढा’ ह्या कोष्टकाचे रोजच्या रोज पारायण करणा~या तिने अपेक्षे प्रमाणे खो घातलाच. काही लोकांना शिव्या देऊन वाक्याची सुरवात करायची सवय असते. ’ब’, ’भ’ वाक्याच्या सुरवातीला आल्याशिवाय त्यांना मुळी काही बोलताच येत नाही. त्याच प्रमाणे माझ्या ह्या मैत्रिणीला ’न नरे नकारातला’ हे कोष्टक न वापरता मुळी बोलताच येत नाही. "नाही ग", "नको ग", "माला नही ग जमणार", "अत्ता नको ग", वगैरे वगैरे. कायम असे नकाराचे ढिंडोरे बडवत असल्या मुळे खूपदा आपल्याला न जाणवणा~या वा न त्रास देणा~या दु:खांचे ती स्मरण करून देते. ती स्वभावाने खूप चांगली आहे ह्यात वाद नाही. पण माणसाने नुसत चांगल व सरळ आसून उपयोगाचे नसते. Positive energy spread करणारे positive vibes असणे जास्त आवश्यक आहे. आपल्या आनंदात सहबागी होणारी व दु:खात आपली मदत करणारी मैत्रिण पाहिजे. दु:खात सात्वन करणारी अथवा सुखाच्या क्षणी आपल्या दु:खाची आठवण करून देणारी मैत्रिण काय उपयोग. मग हळूहळू आपण तिच्या पसून दुरावतो.

कुठेतरी ह्या नकाराची सुरवात अगदी लहान पणापसून म्हणजे अगदी आपल्या कानावर पहीले शब्द पडायला
लागल्या पसून होते असे मला वाटते. माझी भाची अहना जेव्हा आमच्या आयुष्यात आली तेव्हा पसून हे मला
प्रखरतेने जाणवायला लागले आहे. सध्या ती ७ महिन्याची झाली असून अतीशय मस्तिखोर झाली आहे. तोंडात दोन्ही हात कोंबून तिला असीम आनंद मिळतो. मग कुणितरी तिला चांगल्या सवई लागाव्यात म्हणून," अहना
तोंडात हात नाही घालायाचा, शी!" केव्हा ती रडायला लागली की, "रडायच नाहीअस, वेड्या मुली सारख" अस
म्हटल जातच. "नाही" हा शब्द आपण इतक्यांदा म्हणत असतो की मला वाटत की लहान मुल म्हणूनच शिकतात नाही म्हणायला. एकदा माझ्या वाचनात आले होते की "भरतात माणस कुठल्याही वाक्याची सुरवात आधी "नाही" म्हणजेच "NO" ह्या शब्दाने करतात.


उदा.:
१ माणुस: दादरला जायला train सोईसकर आहे का bus
२ माणुस: नाही! मला वाटत तुम्ही train नी जा. Bus नाही म्हटल तरी खूप फिरून जाते.
(प्रतेकाने स्वत: स्वत:च judgement घायला हारकत नाही. घरी, office मधे जरा स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष द्या. आपण कीती वेळेला नाही म्हणतो ते पाहून आपल्यालाच आश्चर्याचा धक्का बसेल)

Japanese person: I think most of the Indians always start the sentence with No.
Indian person: No! I don't think so its true. (we ourself use 'No' so frequently that we do not even realize that we have just said it)

"नाही म्हटल तरी" हे कोष्टक तर आपण हे किती सरास वापरतो. त्यात थोडासा का होईना नकार, नकारत्मक विचार आलाच की. "नाही म्हटल जरा कठिण trek ला जाऊन बघाव". "नाही म्हटल तरी ती हुशार आहे!" अस आपण सहज बोलतो. अस म्हणण्या पेक्षा "मी कठिण trek ला जाते/ जाणार आहे", "ती मुलगी खरच हुशार आहे" अस सरळ साध बोला न! (सरळ साध आपण का नाही बोलत).

We Indians are famous to say 'Yes' just like 'No'. खरच विचार करा. आपण खरच ’हो’ म्हणताना डोक्यानी ’नाही’च म्हणत असतो. "Always think positive" or "How to think positive" "सकारात्मक विचार केल्याचे फायदे" अशी पुस्तक आपण मोठेपणी वाचतो. पण त्याचा उपयोग आपण आपल्या नंतरच्या पिढी परियंत कसा पोहोचवतो त्याचा पण विचार नको का करायला. लहान लहान गोष्टीतून जर का आपल्याला हे सकारत्मक विचात मुलांवर कोरता आले तर मोठेपणी त्यांना "Personality development" "How to pass positive vibes" "How to think positive" असल्या courses ला जाण्याची गरजच उरणार नाही.

माणसाने नेहमी सकारात्मक विचार करावा अस आपण सारख म्हणतो. मग लहान मुलांना वाढवताना हा सकारत्मक विचार आपण बोलण्यात आणला तर? अहनाच्या बाबतीत आता आम्ही कटाक्ष घातला आहे. अहना तोंडात बोट नाही घालायच अस म्हणण्या पेक्षा आम्ही "अहनाने आता तोंडातून बोट काढल आहे" अस म्हणतो. कुठेतरी नकळत आपण आपल्या मुलांवर नकार अथवा नकारात्मक गोष्टी बिंबवत असतो. हो ना!

Thursday, February 25, 2010

अहो! ऎकलत का?

अहो! ऎकलत का?


पूर्वीचा काळी हिंदू बायका आपल्या नव~याच नाव घेत नसत. त्यातूनच मग "नाव घेण्याचा" प्रकार सुरू झाला. त्या निमित्ताने त्या सणासूदीला आपल्या नव~याच चार-चैघांसमोर नाव घेत असत. एरवी त्या नव~याच्या नावाच नामकरण करत असत. "आमचे हे, अहो, धनी, चिंटुचे/मिनेचे बाबा" वगैरे वगैरे.. अहो ऎकलत का? ह्या नावाची एक serial पण जाम गाजली. धमाल comedy. पण .........


अहो ह्या शब्दाचा जपानी भाषेत अर्थ होतो,"Dumb person or Nuts". मराठी आणि जपानी भाषा किली मिळती जूळती आहे नाही? म्हणजे मराठी शब्द, त्याचा उपयोग आणि जपानी अर्थ. आजकाल आपण सरदार हा शब्दाचा जसा उपयोज करतो ना तसच काहीस तर झाल नही न ह्या जपानी भाषेमधे. तस बघता अशोक राजाच्या मुलीने आपली खूप संस्क्रुति जपानला नेली आहे. तिनेच तर नेला नाही हा शब्द?


आजकाल आपण," क्या सरदार हे रे तू!" अथवा "काय सरदार आहे!" अस बिंधास बोलतो. तसच जपानी लोक「あほちゃうか - आहोच्याका?」म्हणजे - कसला मंद आहेस! अश्या अर्थी वापरतात. सरदार लोकांच्या हर्कती बघून आपण हा शब्द काढला तसाच त्या जपानी लोकांनी काढाला असावा...


आजकालच्या मुली नव~याला नावनेच हाक मारतात. पण कधीतरी त्याला आदरार्थी हाक मारायला काय हरकत आहे, नाही? त्याचही समाधान आणि तुमच ही! :-) :-)

Wednesday, September 23, 2009

माझ्या कल्पनेतील 'Kitchen Automation' ची दुनीया...

कालचीच गोष्ट आहे. मी रात्री झोपण्याची तयारी करत होते. गाद्या घातल्या आणि लक्षात आल की त्यांची Alignment काहिशी चुकलेली आहे. चटकन Align Button शोधण्यासाठी गादीच्या वार नजर गेली आणि माझच माला हसू फ़ुटले. पण मग एक पूसटशी [पूसटशी कशाला, चांगली दांडगी] इच्छा मनात आली. माझ्या कल्पनेतील Automation ची दुनीया...

Technology, Automation असे शब्द office मधले. त्यांचा घरी म्हणावा तसा फ़ारसा उपयोग होत नाही. तस बघता 5S system मधे आपण घरातल्या kitchen ची उदाहरणे सांगत - वापरत असतो. मग घरातल्या automation ला का बरे प्रधान्या देऊ नये. Technology च्या क्रांतीने Food-processor, Automatic washing machine, Microwave ह्या गोष्टी घरात नुसत्या आल्या नाहीत तर ग्रुहीणींचे अनेक आशीर्वाद सुद्धा त्यांनी मिळवले.

पण अजून आपल्याला ह्यात खूप प्रगती करायची गरज आहे.
उदा. घरच्या कामासाठी Ctrl + A, Ctrl + C, Ctrl + V, Ctrl + X आणी Crtl + Z अश्या काही गोष्टींच सौशोधन करण्याची.

मी वरील सांगीतलेला किस्सा ह्या गोष्टीचा वापर करून जरा आता पुन्हा imagine करून बघा.
प्रसंग - रात्रीची झोपण्याची तयारी करणे : मी Remote Monitoring System सारखी कसली तरी technology वापरून बसल्या जागेवरुन गाद्या घालते आहे. अथवा - Touch screen चा वापर करून वरील Ctrl सारख्या commands देते आहे. गाद्यांची Alignment चुकणे केवळ अशक्याच. आणि alignment समजा चुकलीच तर Just-a-click Align paragraph वापरून ती ताबडतोप व्यावस्थीत करणे.

स्वयंपाक करताना मीठ अथवा मसाला कमी जास्त पडला? No-Problem... Paint brush, Dream Viewer सारखा काहीतरी tool वापरून त्यात भाजी Crtl + X आणी Ctrl + V करून paste करा आणि Color pannel मधल्या Edit color सारख काहीतरी वापरून Edit मसाला, Edit मीठ वापरून ती भाजी Edit करा - की झालीच की First class भाजी तयार.

मी एकटी राहील्यापासून मला ह्या Crtl किव्हा Undo [Crtl + Z] ची गरज अधीकच भासायला लागली आहे. एकदा मी पोळ्या करताना ’नजर हटी - दुर्घटना घटी’ तशी पोळी करपली. काश माझ्याकडे undo हा option उपलब्ध असता... :(

माझ्या सारखा अनेक जणांना अजून एका गोष्टीचा तिटकारा नक्की येत असणार. ती म्हणजे,’जेवण झाल की खरकड काढण्याचा आणि थोडीफ़ार गरजेची भांडी घासण्याचा’. जेऊन सुस्तावलो की हे सगळ करायच म्हणजे office time संपल्यावर boss नी काम दिल की कशी संतापाची भावना येते तसच काहीस.... लहान असताना मी आईला नेहमी म्हणायचे,’जेवण झाल की एक button पाहीज, जेणेकरून सगळी खरकटी भांडी खाली washer मधे पडून चांगली लख्ख होऊनच वर येतील’आणी आपापल्या नेमलेल्या जागेवर जाऊन विराजमान होतील. [अर्थात त्या वेळी washer माहीत नसल्याने, ती भांडी खालच्यांच्या घरात पडावी अशी ईच्छा असायची, आम्ही top floor ला राहतो हे काही सांगायला नको].
ही आजूनही माझी सुप्त ईच्छा आहे.

अजून एक अत्यंत गरजेची ईच्छा म्हणजे - Human Fax machine. मी ह्या बद्दल आधीच्या blog मधे बोललेच आहे. घरातून स्वता:ला fax करायच आणी काहीच सेकंदात office च्या खूर्चीवर बाहेर. शेतकऱ्याने भाजी सरळ Fax करायची की भाजी direct घरातल्या fridge मधे.

Microwave, washing machine ह्या गोष्टीना 'The most innovative and useful technolog' चा किताब मिळाला ही गोष्ट खरी आणी योग्य असली तरी, आणि ह्या गोष्टीमुळे काम सोपे झाले आहे ही गोष्ट सुद्धा जरी खर असल तरी अजून आपल्याला खूपssssssss प्रगतीची आणी Automation ची गरज आहे.

Sunday, November 30, 2008

मी काढलेले काही ‘Sketch’。

मी काढलेले काही ‘Sketch’。 मला साधारण पणे लहान मुलांचे भाव टिपयला जास्त आवडतात。अलिकडे मी काही माझे मित्र - मैत्रिणीचे [तरूण मुला - मुलिंचे] चित्र काढले आहेतच, पण त्याच बरोबर काही व्रुद्ध लोकांचे पण चित्र रेखाटले आहे - माझी आजी आणि Valley Of Flowers ला भेटलेले एक अजोबा. त्याच बरोबर Beauty of Valley अस माझ्या मित्राने नाव दिलेली एक गोड मिलगी.

More: http://picasaweb.google.com/sharvani.khare/MyPaintings#

Friday, September 26, 2008

लग्न, ज्योतिषी आणि मी。。。

अडचणीत माणसाला देव आठवतो म्हणतात. मी म्हणते, कलियुगातल्या माणसाला अडचणीत ज्योतिषी आठवतो. कलियुगात माणसाला देव भेटेल हे दुर्लभच. मी सुद्धा ह्या न त्या कारणांसाठी ज्योतिष्याकडे कडे गेले अहे. माझा जन्म २९ डिसेंबर १९८१ ला पहाटे १.१४ मि. ला - मुलुंड - मुंबईला झाला. [ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणा~यांनी खुशाल माझी पत्रिका मांडावी आणि माझे फुकट भविष्य सांगावे. ] आता पर्यंत अनेक ज्योतिश्यांनी माझी पत्रिका मांडली आहे. पत्रिकेप्रमाणे माझे दर सहा महिन्याने चांगले दिवस येतात. प्रत्येक्षात मात्र 'त्या' सहा महिन्यांची वाट मी अद्याप पहात आहे. वेळेप्रमाणे मांडलेल्या गणितात माझे ग्रह उच्च स्थानी असतात किंवा सहा महिन्यानी ते उच्चीचे होणार असतात. प्रत्येक्षात तसे घडत नाही आणि मग सुरू होते पुढल्या सहा महिन्यांची प्रतिक्षा. मला तर वाटतं माझी जन्माची वेळच त्या डॉक्टर ने चुकीची नोंदवली आहे. सगळे ग्रह मजबूत व उच्चीचे असताना घोडं अड़ते कुठे हेच समजत नाही.

मुलीच्या लग्नाची काळजी सगळ्याच आई - वडीलांना असते तशी माझ्या आई बाबांना पण आहे. अपल्या मुलीला योग्य असा जोडीदार मिळेल का? [आजकालच्या नवीन अमेरिकन फॅड प्रमाणे मुलगी जावईच शोधेल ना? अस पण काही आई वडिल या ज्योतिष्याकडे तसल्ली करून घेत असावेत. नाहितर ही आमच्या मुलिची बायको, अथवा हा आमच्या मुलाचा नवरा अशी ओळख करून देण्याची वेळ येईल ह्याची धास्ती. तो काळ अता भारतात दूर नाही म्हणा!!.] असो... तर मी पण माझे ग्रह सध्या कोणत्या घरात वास्तव्याला अहेत हे विचारायला जोतिष्याकडे गेले. मी ज्या घरात जन्मले त्याच घरात अद्याप राहते आहे. पण माझ्या ह्या ग्रहानी आता पर्यंत अनेक घर बदलली आहेत. बर घर बदलून तेथे वास्तुशांत नको का करायला? दोन चार संस्कृत श्लोक म्हटले की घरात शांतता नांदते. [घरात म्हणजे घरातल्या माणसात असे समजू नये.] माझे ग्रह घर बदलून वास्तुशांत करत नसावेत, म्हणून मग ते घर मला त्रास द्यायला लागत.

。"तुमच्या मुलीचं लग्नानंतर भाग्य उजळणार आहे" अस एकाकडून समजले. माझ्या नव~याच्या ग्रहांच्या मांडणी नुसार लग्नानंतर हाल अपेष्टा असाव्यात, तरिच तो आजून मला भेटलेला नाही.

。"तुझा नवरा पायलट असेल" अस एका पठ्ठ्याने मला सांगितले. त्या दिवसा पसून मी अनेक वर्षे विमानाकडे डोळे लाऊन बसले होते. नंतर त्याच ज्योतिष्याने काही वर्षांनी मला software engineer नवरा मिळेल असे सांगितले. माझ Plane अश्या प्रकारे office मधे Land झाले. लग्नाला उभ्या असलेल्या मुलींच्या भावनांशी असे खेळू नये :-(

。 एका जोतिषाने तर सांगीतले, "ह्या मुलिशी जो लग्न करेल तो मुलगा खूप भग्यवान असेल म्हणे". थापड्या जोतिषी नुसता. माला तर स्वता:लाच स्वताच्या नव~याची दया येते. माझी अखंड बडबड सहन करायला लागणार आहे त्याला. आणि तो भाग्यवान?

。 Arrange marriage चांगले का Love marriage हा सगळ्यांना पडणारा प्रश्न. मला कशाचाच तिरस्कार नाही. Arrange किंवा Love किंवा Marriage ह्या सगळ्यांच्या बाबतीत मी समतोल विचारांची आहे. पण तो arrange marriage मधला "मुलगी बघण" हा प्रकार काही मला झेपलेला नाही आणि जमणार पण नाही. अम्हाला पत्रिका बघायची नाही - आमचा ह्यावर विश्वास नाही, असे ठासून सांगणारे पुढे म्हणतात, "पण मुलीला मंगळ तेवढ नको" हा अर्धवट पणा. मुलीचा संपूर्ण फोटो पाठवा - कशाला ? माझे पायगुण बघायला? काय हा पोरकट पणा. [अश्या लोकांना प्रतिका पाठवायची नाही... अस मी आईला सांगितले. त्यावर आईने मला ४ (४०००) समजूतिच्या गोष्टी सांगितल्या.]

。ह्याला कंटाळून मी एका जोतिष्याला सरळ विचारले,"माझ love marriage होईल का? योग आहे का?" त्यावर त्यांनी "तुझा love marriage चा योग निघून गेला" अस सांगितल. निघून गेला? असा कसा निघून गेला योग? बर मग योग जेव्हा केव्हा होता तेव्हा ३-४ नाही तरी एखाद्या तरी मुलाने मागणी नको का घालायला? मला योग आलेला कळायच्या आतच तो योग शेजारच्या घरात निघून गेला :-(

माझ तर ह्या ज्योतिष्यांना एक सांगण आहे - काही ज्योतोषी सांगतात... पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा अग्नेयला जा अस सांगण्यापेक्षा सरळ पत्ता का नाही देत? सरळ मला पत्ताच सांगा न!

लग्न, ज्योतिषी आणि मी。。。यांचे ग्रह आजून जुळलेले नाहीत.

Tuesday, September 09, 2008

"Valley of Flowers - पुष्पवटी"

"Valley of Flowers - पुष्पवटी"
ऑगस्ट - १७ ऑगस्ट २००८

Its rightly said, "The World is a book, and those who do not travel read only a page."

चरातीचराती चरतो बघ: - जो चालत असतो तोच ज्ञान प्राप्त करतो. ट्रेकिंग करण्यामागे हेच कारण आहे. आपल्या भारत देशात एवढी विविधता आहे, अनेक रंग त्याच्या विविध छटा, अनेक भाषा, अनेक चेहरे, प्रत्येक जागेचा स्वत:चा असा इतिहास, त्यातून आलेला पेहराव आणि संस्कृती हे भाराऊन टाकणारे आहे. भारत देशाकडे ह्या दृष्टीकोनातून बघणारा ह्या देशाच्या प्रेमात पडला नाही तरच नवल! एकीकडे सैह्याद्रीचा रौद्र कडा तर दुसरीकडे हिमालयाचा विस्तार. एकीकडे खवळलेला समुद्र तर दुसरीकडॆ विस्तिर्ण वाळवंट, एकीकडे शांतपणे वाहणारी कृष्णा तर दुसरीकडॆ दुथडी वाहणारी गंगामैया. आमचा हा ट्रेकसुद्दा या गंगामैयाच्या दर्शनानेच सुरू झाला.



दिवसदिवस पहिला - ९ ऑगस्ट २००८
९ ऑगस्टला गरिब ? रथ ने आम्ही मुंबई हून दिल्ली ला निघालो. 'गरिब'रथात सगळ्या सुविधा होत्या, नव्हता तो म्हणजे कोणीगरिब. गाडीत गेल्या-गेल्या adjustment ला सुरवात झाली. १ भला माणूस चटकन जागा बदलायला तयार झाला. तो इतका adjustable होता की आम्ही मजेत म्हणालो सुद्धा - ह्याला कुणी टपावरची जागा adjust कराल का? अस विचारल असत तर तो भला माणून टपावर पण गेला असता. त्यात एक मिठाचा खडा अला, एक शिष्ठ माणूस - शिष्ठ नाहितर काय, एवढ्या भल्या शब्दात आणि गोड अवाजात मी त्याच्याशी बोलले तरी शिष्ठ बुड हलवायला तयार नाही. काही माणसं पैदाइशी दु:खी वाटतात त्यातला तो. असो .... तर आम्ही दिल्लीला पोचलो.



दिवसदिवस दुसरा - १० ऑगस्ट २००८
दिल्लीवरूनदिल्लीवरून हरिद्वारला जाण्यासाठीची Train म्हणजे 5 Star hotel मधून चहाच्या ठेल्यावर आल्यासारखे वाटले. हरिद्वार च्या राम झुल्यावर परत एकदा जाऊन मजा आली. ८ वर्षा पूर्वी आई - बाबां बरोबर आले होते. गांगेचा किनार, अलोट भक्तांची गर्दी, लक्ष्मण झुला, बोलो बंबम - बंबम चा जयघोश, सगळ तसच होत. GMVN 「गढ़वाल मंडल विकास निगम」 मधला आमचा मुक्काम मस्त झाला.



दिवसदिवस तिसरा -११ ऑगस्ट २००८
पहाटॆपहाटॆ उठून आम्ही आमच्या हरिद्वार ते जोशीमठ प्रवासाला लागलो. त्या बस मधे आमच्या सोबत होते ते बिहारी बाबू. त्यांच्या आंगाला येणारा वास आणि त्यांच्या न संपणा~या बिड्या. दर वर्षी फ़क्त एकदा गंगेत येउनच स्नान करत असावेत. त्यांच्या अंगाच्या वासाच्या जोडीला त्यांच्या बिड्या. त्यांच्या बिडीच्या धुराने आम्ही सर्वांनी किती बिड्या ओढल्या ते गंगामैयालाच ठाउक. आम्हा सगळ्यांच १-२ वर्ष आयुष्य कमी झालं हे नक्की. चौदा तासाचा तो बिडीमय प्रवास म्हणजे भारतातल्या गलिच्छ लोकांच दर्शन होत. अजून तो धूर आठवला की खोकला येतो. पण त्याला तडा द्यायला होते गंगामैया च्या घाटातले वेडेवाकडे वळण. Driver अश्या वळणावर गंगामैयाचा घोश करत, "बोलो गंगामैया की जय"असे म्हणून ते वेडेवाकडॆ वळण पार करत असत. ह्या सगळाला सोबत होती ती म्हणजे सुंदर अशा निसर्गाची. डोळे दिपवून टाकणे म्हणजे काय ते येथे समजल. चौदा तासाचा तो गलिच्छ लोकांबरोबरचा प्रवास मी मनसोक्त photography करून घालवला. गंगामैयाला भेटायला आलेले ढग म्हणजे - "अप्रतिम" हा एकच शब्द. खाली वाहणारी गंगामैया, मोठाले पर्वत, आणि ढग असा अनोखा संगम आपणास पहावयास मिळतो. आपल्या जवळच्या मैत्रीणीला भेटायला आतूर झालेली भागिरथी खळखळत वाहात येउन कडकडून अलखनंदेला येउन भेटते. हा अलखनंदेचा आणि भागिरथीचा मैत्रिपूण संगम, ह्यालाच पूढे जाउन आपण गंगा म्हणून ओळखतो. अलखनंदा आणि भागिरथी च्या संगमाचा आनंद घेत आम्ही तो प्रवास करित होतो. तेवढ्यात गिरिशचा किन्चाळण्याचा आवाज आला, " अरे गाडी थांबवा, कुणीतरी ओकलायं माझ्यावर". आम्ही गोंधळून गेलो, कसली गडबड तर दिसत नव्हती. मग लक्षात आले , गिरीषच्या मागे बसलेल्या माणसाने त्याच्या आंगावर उलटी केली होती. मुळात गिरीष बस लागते म्हणून Window seat शी बसला होता तर त्यालाच असा प्रसाद मिळावा? मग काय सगळ्यांनी मिळून त्याला जाम पिडले. जाम मजा आली. त्यात अमोल ने तर height केली, त्या माणसाला त्याने जाऊन विचारल, "भाईसाब, क्या आपका अभिबी जी मचल रहा हे?" अमोलच नशीब बरवत्तर म्हणून बर, आणि हा प्रश्न त्या माणसाच्या बायडीला विचारला नही म्हणून वाचला म्हणायचा. असे सगळे चांगले - वाईट अनुभव घेउन आम्ही जोशीमठ ला पोहोचलो. शंकराचार्यांच्या मठात जाण्याचा योग आला. शंकराचार्यांनी बांधलेल्या चार मठांपेकी हा एक. बाकिचे तीन मठ म्हणजे, रामेश्वर - दक्षिण, द्वारका - पश्चिम आणि पुरी - पूर्व.





दिवस चौथा - १२ ऑगस्ट २००८
"हेमकुंड"


देवदेव काही लोकांना फुरसतीने बनवतो म्हणतात, तसच काही जागा सुद्धा देव फुरसतिनेच घडवतो, त्यातली एक म्हणजे "Valley Of Flowers - पुष्पवटी" आणि "हेमकुंड". देवाने ह्यात इतके विविध रंग भरले आहेत, इतकं नाजूक नक्षीकाम केल आहे की डोळे दिपून जातात. जोशीमठ ते घांगरीया हा १३की. चा प्रवास आम्ही खेचरावर / घोड्यावर केला. मी आधी बसले त्या खेचराचे नाव विरू. अत्यंत बेकार खेचर. मी बसल्या बसल्या महाराज निघाले आणि मला घेऊन एका खड्यात उतरले. मी तो पर्यंत नीट मांड पण टाकली नव्हती. स्वता:ला वाचवण्याच्या गडबडीत मी एका काटेरी झाडाला पकडले. पूढे खूप दिवस बोटं सुजलेली होती. मी कॉलेज ला असताना थोड Horse riding केल आहे. पण ते अत्यंत trained horse होते. ह्या विरूनी जाम त्रास दिला. शेवटी मी आणि अमोलने खेचर बदलली. बसंती दमदार होती. २-३ तासात आम्ही घांगरीयाला पोहोचलो. त्याच दिवशी हेमकुंड करायचं असं ठरलं. वेळ कमी असल्या कारणाने आम्ही परत खेचरावरून /घोड्यावरून जायचं ठरवल. आम्ही हेमकुंडाकडॆ जात असताना आम्हाला परतीचे प्रवासी भेटत होते, "अभी तो गुरुद्वारा बंद हो गई, अब जानेसे कोई फायदा नही" असले सल्ले मिळाले. पण आमच्या नशीब बलवत्तर होत. आमच्या आग्रहास्त्व त्यांनी गुरुद्वारा उघडली. गुरु गोविंदसिंग ह्यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही गुरुद्वारा शिख लोकांच दैवस्थान आहे. गुरुद्वाराच्या मागे आहे - हेमकुंड. हेमकुंड- हेम म्हणजे हिमालय आणि कुंड. हिमालयाचा कुंडा. हे साधारण १५००० फुटांवर वसलेल आहे. प्रचंड थंड अशा त्या कुंडात सरदार डुबकी मारतात. हिंदू लोकांसाठी गंगेला जे महत्व आहे, ते महत्व हेमकुंडाला शिख लोकांमधे आहे. अशा पवित्र कुंडात डुबकी मारण्याची हिम्मत झाली नही. पण मग मी ते अती थंड पाणी डोळ्यांना लावल. त्या थंड आणि पवित्र पाण्यात हात घालून माझी बोटांची सुज कमी झाली. तेथे असलेल्या लक्ष्मण मंदिरला भेट देउन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हेमकुंडा वरून परत येताना घोड्याची सवय झाली असली तरी परतल्यावर शरिरात जितकी म्हणून हाड (शिल्लक)होती ती सगळी बोलायला लागली होती. घांगरीयाला आल्यावर मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यावर बर वाटल . हा पहिलाच असा ट्रेक होता जेथे आम्हाला आंघोळ करण्याचा आनंद मिळाला. असं सुख ट्रेकला दुर्लभच. अर्थात आंघोळ करुन fresh होऊन आम्ही झोपी गेलो हे ओघाने आलेच.


दिवसदिवस पाचवा - १३ ऑगस्ट २००८
"Valley Of Flowers"



सकाळीसकाळी लवकर तैयार होऊन आम्ही Valley ला निघालो. 「रघुविर चौव्हाण」 हे आमचे लोकल गाईड 「Local Guide」. M Sc Botany झालेले चौव्हाण गेली ३० वर्ष Valley मधे एक अभ्यासक म्हणून हिंडत आहेत. Ticket काढण्यासाठी आम्ही थांबलो असताना, मी पिट्टूत बसून घेतले. घोड्यावर बसताना पण माला जेवढी भिती वाटली नव्हती तेवढी भिती मला ह्या पिट्टूत बसताना वाटली. एक तर आपण कुणा माणचाच्या पाठीवर बसायचे ही कल्पनाच मनाला पिळ पाडण्यासारखी आहे. [अर्थात, ढष्ट - पुष्ट सरदार आणि सरदारीणींना ह्या पिट्टूत बसलेल बघून, "रोज माझ्या सारख भाड मिळूदे" अशी त्या माणसाने गंगामैयाला साकड नक्की घातल असणारच.] Valley मधे साधारण ३५० प्रकारची फुले अढळतात. लोकांच असा समज आहे की जुलै - ऑगस्ट ह्या सिझन मधे आपल्याला ही सर्व फुल बघावयास मिळतील. सरांनी सांगितल्याप्रमाणे, वर्षभरात वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळी फुल उमलतात. बर्फ असताना उमललेली फुल बर्फाबरोबर नाहिशी होतात. तर काही बर्फ वितळण्याच्या वेळेला, तर काही पावसाळ्यात अढळतात. Forget me not, Arisaema Tortuosum, Geranium Wallichianum, Codonopsis Virdis etc. असे अनेक फुलांचे प्रकार आम्ही बघितले. [ही सगळी नाव माझ्या स्मरणशक्ती मुळे आठवून लिहीलेली नाही. पुस्तकातून शोधून लिहीली आहेत, उगाच गैसमज नको.] नचिकेत ने ह्यावर एक भारी किस्सा केला होता. सर फुलांची नाव सांगत होते आणि आम्ही नविन नावाबरोबर आधिच नाव विसरत होतो. त्यावर नच्याचे टिपण असे की, सरांना आपण कुठे चुकू नये म्हणून बरोबर घेतल आहे, बाकी काही नाही. [त्याच्या ह्या जोक ला, नंतर आम्ही 'Best Joke of the Trek" अस award दिलं.] Valley सरांनी आम्हाला पहिल्या फुलाची माहिती दिली आणि गिरिशला नेहमीप्रमाणे बाळबोध प्रश्न पडला, ही फुल आपण खाऊ शेकतो का? फळ खाण्यासाठी असतात हे माहिती होत पण फुल खाण्यासाठी कोण विचारेल अस वाटल नव्हत कधी! एक निळ्या रंगाच फळ खाण्याची परवानगी सरांकडून मिळाली. गिरिश ने ती असंख्य प्रमाणात खाल्ली हे सांगायला नकोच. Valley म्हणजे देवाची बाग. ही बाग देवाने अनेक रंगांनी नटवली आहे. त्या Valley ची गुलाबि छटा बघून कुणाचे 'होश' उडले नसतील तरच शपथ! असंख्य फुल, Glacier बघून व मनसोक्त photography करुन आम्ही परतलो. मन ह्या फुलांनी फुलून गेले होते.



देवाने ज्या प्रेमाने येथला निसर्ग नटवला आहे तसच येथली माणस.






दिवासदिवस सहावा - १४ ऑगस्ट २००८

ह्याह्या ट्रेक मधे दोन अविस्मरणीय गोष्टी घडल्या, त्यातली एक. परतीचा प्रवास - घांगरीया ते गोविंदघाट. परतीच्या प्रवासात मी आणि मानसी सोडल्यास सगळ्यांनी चालत जायच ठरवल. मानसीचा पाय वाईट दुखावला गेल्यामुळे आणि मला horse ridingचा आनंद लुटायचा होता म्हणून मी - असे दोघींनी घोडे घेतले. मी ह्या वेळी घेतलेला घोड्याचे नाव "शेरू" ! अत्यंत रुबाबदार असा हा घोडा. Tall - Dark and Handsome. एके ठिकाणी checkpost वर आम्ही थांबलो असता, माझ्या घोड्याचा मालक receipt शोधण्यात मग्न असताना, त्याने शेरूला चरण्यासाठी बाजूला सोडले. हे महाशय असे थांबणार थोडीच!!. ते निघाले मला एकटीला घेऊन . सुरवातीला मजा वाटली पण मग हे थांबायच नावच घेईनात. अर्चनाने सुरवातीला घोडा केला होता. मी पुढे जाऊन तिच्या घोडेस्वाराला माझा घोडा थांबवायला सांगितला. मग मात्र मला चेव आला आणि मी जवळ्जवळ तीन साडे तीन तास त्या valley तून एकटीने मनसोक्त horse riding केल. त्या घोडेवाल्याले मला लगाम कसा ओढून घोड्याला दिशा दखवायची, टाच मारून त्याला चल म्हणून सांगायचे हे शिकवले. "हिबरू" हा एक शब्द मी त्याच्याकडून शिकले. हिबरू म्हणजे - "चलिऎ, चला हुहूर." मधे एके ठिकाणी एका ठेल्यावर तो स्वता: थांबला. थांबला म्हणजे ठेल्याच्या समोरच्या एका उंच जागी चढला [सवई प्रमाणे], तेव्हा मी एवढ्याने ओरडले. [त्या वेळेला त्याला कुणितरी पाठिवर बसल्याची जाणीव झाली असेल.] पण मग मी बिंद्दास होऊन मनसोक्त horse riding केल. मधे मी आमच्या ग्रुप च्या खूप पुढे आले होते, म्हणून मग आम्ही एके ठिकाणी थांबलो. मी लगेच फोटो काढण्यात मग्न झाले. तव्हा शेरू ने माझ्या खांद्यावर अलगत मान टाकली. तो क्षण माझ्या आयुश्यातला आनंदाचा क्षण. This was the most memorable day and moment of my life. गोविंदघाट ला उतरल्यावर मी त्या घोड्याला एक गळ्यातला पट्टा विकत घेतला, माझी आठवण म्हणून. घोडेवाल्याने आम्हाला गोविंदघाटाच्या बरच आधी सोडल्यामुळे आम्हाला आमच्या बॅगा उचलाव्या लागल्या. जोशीमठ ते हरिद्वार मार्गा वर landsliding झाल्यामुळे आम्ही बद्रिनाथला जायचे रद्द केले. त्यावेजी आम्ही औलीला गेलो. औली हे skiing करण्यासाठीचे भारतातले प्रसिद्ध ठिकाण. ह्या ठिकाणी cable car नी जावे लागते. परत जोशीमठात येऊन आम्ही थोडा timepass करून झोपी गेलो.


दिवसदिवस सातवा - १५ ऑगस्ट २००८

Most thrilling, exciting, horrifying day. This thrill was exclusively captured by Sharvani n Amey's channel. जोशीमठातून आम्ही हरिद्वारला निघालो. आमच्या सुदैवाने आदल्या दिवशी पूर्णपणे बंद असणारा जोशीमठ ते हरिद्वारचा महामार्ग , आम्ही निघालो त्याच्या १ तास आधी सुरू झाला. मुसळधार पावसामुळे खूप ठिकाणी landslide झालं होतं. अशाच एका landsliding मुळे आम्ही अडकलो . मी, अर्चना, अमेय, गिरिश आणि अमोल ते बघण्यासाठी उतरलो. काही लहान - मोठे दगड - धोंडे बाजूला केल्यावर एक मोठा दगड काढण्यासाठी सुरंग लावण्याचे ठरले. सगळ्या लोकांना लांब करण्यात आले. "गाडी में जाके बैठो " असे सांगण्यात आले. पण आम्ही धाडसी [अगाऊ] बाहेरच थांबलो. मी आणि अमेय हे सगळ Live आमच्या कॅमेरात टिपण्यासाठी म्हणून आतूर होते, आणि जरा अगाऊगिरीने पुढेच उभे होतो. बारूद भरला गेला. मग त्या JCB च्या कामगाराने आधी बिडी शेलकावली आणि मग ती त्या वायरीला लाऊन त्याने धूम ठोकली. Countdown चालू झाले. मी कॅमेरा फोकस करून उभी होते. हात कापायला लागला. आणि काही सेकंदात एक मोठा विस्पोट झाला आणि त्या दगडाचे तुकडे उडाले. त्या क्षणी घाबरायला पण वेळ नव्हता. आम्ही धूम ठोकुन समोरच्या bus मधे चढलो. सगळ्यांची धावपळ झाली. त्या क्षणी मजा वाटली पण आता तो video परत बघताना त्याच गांभीर्य जाणवते. त्यात १५ ऑगष्ट ला माझ्या आईचा वाढदिवस. अशा दिवशी उसणे धाडस करायला नको होते. पण असो ... मजा आली, हे मात्र १०० टक्के खर. रस्ता सुरू झाल्यावर आम्ही निघालो आणि हरिद्वारला पोहचलो. भारतातल्या निसर्ग वरदानाला दारिद्र्याचा आणि अस्वस्छतेचा एक भयंकर शाप आहे. हरिद्वार station हे त्यातल एक उदाहरण. गंगेच अस्तित्व लाभलेल असताना station मधे दारिद्र्याची आणि गलिच्छ लोकांची गर्दी. अख्खे station म्हणजे शौचालय असल्यासारखा सगळी कडे वास मारत होता. त्या लोकांच्या भुकेल्या कुत्रां कुत्र्यांसारख्या नजरा. त्या station वर ३-४ तास कसे घालवले हे गंगेलाच ठाऊक. गंगा मात्र त्या वेळी मला एका असहाय नदी सारखी वाटली. खरच गंगा मैली हो गई! दिल्लीला जाणारी train आली आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.


दिवसदिवस आठवा - १६ ऑगस्ट २००८

सकाळीसकाळी साधारण ९.३० (7.30) ला आम्ही दिल्लीला पोहचलो. नवी दिल्लीला जाण्यासाठी आम्ही मेट्रो पकडली. Clock room मधे सामान टाकून आम्ही दिल्ली भटकंतीला निघालो. राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटला जाऊन आलो. मी हरिद्वार, दिल्ली ह्या दोन्ही ठिकाणी दहा एक वर्षांपूर्वी जाऊन आले होते. पण मित्र - मैत्रिणींबरोबर जाऊन मजा आला. संध्याकाळी ४.३० ला राजधानीतून मुंबईला निघालो. UNO खेळून आम्ही झोपी गेलो.


दिवसदिवस नववा - १७ ऑगस्ट २००८

सकाळीसकाळी साधारण ९.३० (8.30) ला आम्ही मुंबईला परतलो. मी एकटीच मुंबईची असल्यामुळॆ सगळ्याचा निरोप घेऊन मी परतले ते ह्या ट्रेकच्या चांगल्या अशा आठवणी घेऊन.


थांबा ट्रेक आजून संपला नाही आहे.

आम्ही ३१ ऑगस्ट ला पुन्हा भेटले. 'Prize Distribution' साठी.
१。 अमेय जांबेकर - उत्कृष्ट मॅनेजमेंट
२。 शर्वाणी खरे - Photography (First prize)
३。 सैरब मोघे - Photography (Second Prize)
४。 विनोद अलाट - a. Best entertainer b. Best Captions for the photograph (only nominee)
५。 मानसी मोघे - Best UNO player
६。 गिरीश पेंडसे - a. Khataron Ke Khiladi b. Creating entertaining scenes
७。 रोहित ढेकणॆ - Best Trekker
८。 मुकेश चौधरी - Kya aap paanchvi fail Champu Hai
९。 नचिकेत - Best joke of the trek.


[L-R] विनोद, गिरिश, मानसी, नचिकेत, सौरब, अमय, अमोल, अर्चना, तन्मय, गैरी, रोहित, मुकेश आणि मी [photographer]

Wednesday, May 28, 2008

मीच का ?

अनेकदा आपल्या सगळ्यांना पडणारा हा प्रश्न - मीच का? तुम्हाला पण हा प्रश्न अनेकदा पडला असणारच. मी काही तुमच्याहून वेगळी नाही. त्यात माझी "मकर रास" असल्या कारणामुळे अनेकदा असे मीच का? हा प्रश्न पडणारे प्रसंग घडतच असतात. तोंडाशी आलेला घास समोरसा घेउन जातो आणि मग असहाय पणे आपण विचार करतो, मीच का? कधी हस्यास्पद, कधी Embarrassing Moments तर कधी Frustrating, Depressing moments मधे - नेहमी मीच कशी ह्या बाबतीत अडकते, मीच का? असा प्रश्न पडतोच. पण त्याचे उत्तर ब्रह्मदेवालाच ठाउक. इतर सगळ्यांच आयुष्य मस्त असताना, आपणच कसे नेहमी अडकतो? पण आपण देखिल समोरच्यांसाठी इतर असतो हे आपण विसरतो.

Blog लिहीण्याचे कारण म्हणजे करमणूक. म्हणून आपण frustrating, depressing moments बद्दल न बोलता. काही मजेशीर विनोदी घटणाच बघुयत.

मुलुंडच्या platform क्रमांक १ वर मी train ची वाट पहात उभी होते. तेवढ्यात announcement झाली,"Platform क्रमांक १ पर आने आली अगामी लोकल आज platform क्रमांक १ के बजाय platform क्रमांक ३ से रवाना होगी". मग काय... धावा... धावत धावत bridge चढायला लागले. माझ्या बरोबर १ मछली ची टोपली घेऊन १ भैया पण धावायला लागला. धावता धावता तो अडखळला आणि त्याच्या हातून मास्याची टोपली उलटी झाली. माझ्या आंगावर मछलीचं पाणी पडलं. माझ्या बाजूने चालत असलेल्या बाईच्या आंगावर तर काही मासे सुद्दा पडले. ती बाई एवढ्याने ओरडली [जैन असेल्यास तिने किती दिवस त्याबद्दलचं प्रायश्चित्त म्हणून उपास तपास केले असतील तिच जाणे.] मी जाम हसत सुटले, सवई प्रमाणे. ती बाई मात्र जाम भडकली होती, ती त्याला ओरडत होती," ये क्या किया? अब मै office कैसे जाउंगी?" तो भैया पण जरा घाबरला होत पण माला हसताना बघून त्याला धिर आला असावा. "आप train मे चढेगी तो पूरी train खाली हो जाएगी." अस म्हणून तो पण खो खॊ हसत सुटला. तस पण त्याच्यावर भडकण्यात काहीही अर्थ नव्हता. त्याने थोडी हे सगळ मुद्दाम केले होते. चालायचचं. घरी येउन २ तास आंघोळ केली. मी शाकाहारी असल्यामुळे स्वत:च्याच आंगाचा वास नकोसा झाला होता. "मीच का?" आज पण तो प्रसंग आठवला की हसू येते.

Office मधे एकदा असच झालं, मीच का? म्हणण्याचा प्रसंग आला. मी cabin मधे काम करत बसले होते एकटी. Colleague नी lunch साठी buzz केल. मी cabin बाहेर जायला निघले तर समजलं, cabin चा दरवाजा lock झाला आहे. एक चावीवाल्याला सगळी कुलुप तपासायला बोलावले होते. त्याने नेमक माझ्या cabin च lock तपासून बघताना ते lock करून तो चावी घेउन गेला. मी माझ्या कलीगला फोन लावला, तर मी miss call करते आहे अस समजून तिने तो २दा कट केला. मग एकदाचा तिने उचलला फोन. मी तिला जेव्हा सांगीतले की मैं आंदर फस गई हूँ तर ती हसायलाच लागली. वर मला म्हणते," रुक मैं आती हूँ तुझे देखने तू अंदर locked कैसी लगती है, रुकना". रुकना? त्या पलीतडे मी काय करु शकत होते? मी अडकली आहे ही news, office मधे वा~यासारखी पसरली. चावीवाल्याची शोधाशोध चालू झाली. त्या दरम्यान माला बघायला ५-६ जण आले. US च्या आमच्या office मधून Mike नवाचा एक ७फुट ६ इंच ऊंच माणूस आला होता. तो आणि मी अनेकदा एकमेकांच्या बाजूला उभं राहून एक्मेकांना complex देत असू. तो सुद्धा आला मला बघायला. जस काही मी पिंज~यातला प्राणी आहे. Mike मला म्हण्तो कसा," You are looking like a rabit in a huge lion's cage". पिंज~यात्ल्या प्राण्यासारखी मी असाहाय दिसत होते.

मीच का??????????