Thursday, September 22, 2011
आईच्या स्वप्नात आला अमिताभ बच्चन...
आमच्या घरी कसलस तरी function होता आणि त्या function साठी अमिताभजी आले होता. अर्थात आमच्या घरी अमिताभजी आले आहेत हि गोष्ट ऐश्वर्या pregnant आहे ह्या NEWS इतकीच काही क्षणात सगळीकडे हा हा म्हणता पसरली. आणि हा हा म्हणता आमच्या घरी लोकांची गर्दी जमू लागली. आईने वैतागून मग अमिताभजी ह्यांना आमच्या आतल्या खोलीत लपवून ठेवलं. आणि अमिताभजी ह्यांच्या fans ला सांगितलं,"अमिताभ आजकाल असा लोकांकडे येत जात नाही फारसं. तो आला कि खूप गर्दी होते न... कधीतरी अचानक येऊन जातात तो , म्हणजे कुणाला समजत नाही". असं सांगून आईने त्या येणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. बिच्चारे.
आईच्या त्या स्वप्नात fans पेक्षा बिच्चारी अवस्था होती ती अमिताभजी ह्यांची. कारण असं लपून बसून कंटाळा आल्याने त्यांनी मग आमच्या सगळ्यांसाठी मस्त पेकी चहा बनवला. आता एवढ्या मोठ्या कलाकाराने आमच्या साठी चहा बनविलेल बघून आईने सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. आई काय खाऊ घालणार होती हे तिला आठवत नाही. पण कसं आहे... आम्ही सगळे, म्हणजे मी, आई, बाबा, ताई सगळ्यांची उंची बेताचीच. आईला तर कधी कधी ह्या कमी उंची चा भयानक त्रास होतो. म्हणजे हेच बघा. आपण 'न लागणाऱ्या वस्तू’ कपाटाच्या अगदी वरच्या कप्यात ठेवतो. छानसा dinner set असो वा सतत न लागणारी वस्तू असो त्या जपून वरच्या कप्यात ठेवल्या जातात. आता अमिताभजी चक्क आले आहेत म्हंटल्यावर आईला कदाचित त्यांच्या साठी 'तो' छानसा नवा (नवा = न वापरलेला १०~१५ वर्ष जूना) dinner set काढायचा असेल. आता एवढ्या वरती तो जपून ठेवलेला dinner set काढायचा म्हणजे आईला शिडीवर अथवा खुर्चीवर चढणं आलेच. आईने मग चक्क अमिताभ जी ह्यांना हाक मारली व म्हणाली, "उंची मुळे केवढा फायदा होतो हो तुम्हाला, मला जरा तो वरचा डब्बा आणि तो छानसा dinner set काढून द्या." आईनी हे सांगितल्या वर मात्र मी खो खो हसायला लागले आणि मनात आलं, "कुणाला कश्याचं काय तर कुणाला कश्याचं काय".
Monday, September 12, 2011
गणपती विसर्जन - पुणे मुंबई मधील तफावत....
मी एक अस्सल मुंबईकर. माझा जन्म, शिक्षण सगळं मुंबई मधेच झालेलं. सध्या काही वर्ष मी पुण्यात स्थाईक झाले आहे. असं म्हणतात कि मुंबई चा माणूस पुण्यात adjust होऊ शकत नाही. त्याला fast life ची इतकी सवय झालेली असते की पुण्यातली शांतता त्याला खायला उठते. हे थोड्याफार प्रमाणात खरं असेलहि पण पुण्याची भुरळ एकदा पडली की पुणेकर होण्यातली मजा त्याला समजते. मुंबईत पाऊस म्हटलं की अंगावर काटा येतो तसच पुण्यात प्रवास म्हंटला की तो नकोसा होतो. मुंबईत सुविधांना पुण्याचा सुंदर वातावरणाची तोड जरी नसली तरी मुंबईचा समुद्राचा अभाव पुण्याला जाणवतो. थोडक्यात काय तर दोन्ही मध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत. काहीतरी वाटत पुण्याची थंड हवा मुंबई ला export करावी आणि मुंबईची transportation facility पुण्यात आणावी. अर्थात हे स्वप्न आहे. फक्त स्वप्न. असो
मला अनेक जण विचारतात, "पुणे छान की मुंबई"? मुंबईत शिस्त आहे तर पुण्यात एक सुंदर इतिहास आहे. . पुण्यात मराठमोळ वातावरण आहे तर मुंबईत cosmopolitan ची विविधता आहे. आपापल्या परीने दोन्ही आपापल्या जागी छान आहेत.
एक मोठ्ठा फरक मला कोठे जाणवला असेल तर तो गणपती विसर्जनात. बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ साली पुण्यात "केसरीवाडा" सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना करून खर्या अर्थाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केले. गणेश उत्सव खरतर महाराष्ट्रा मधे जास्त करून साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पुण्यात त्या मुलेच की काय खर्या अर्थाने गणेश उत्सव साजरा केला जातो असं मला वाटत. मी आज मुंबईचे गणपती उत्सव आणि पुण्यातील गणेश उत्सव दोन्ही जवळून पहिले आहेत आणि म्हणून मी आज ठाम पणे हे सांगू शकते की पुण्यात अजूनही साजेसा गणेश उत्सव साजरा केला जातो. पुण्यातल्या काही गणेश मंडळांना 'धिंगाण्या' चे स्वरूप जरी आले असले तरी अजून मनाचे ५ गणपती अजूनही आपली शान आणि शिस्त सखून आहेत.
मुंबईत कोणताही कार्य असो अख्खी मुंबई 'बॉलीवूड' च्या तलावात थिरकते. गणपती विसर्जनाचा पण तेच आहे. त्या विसर्जनाला न लय असतो न ताल. असतो तो नुसता धिंगाणा. एक हात वरती उचलायचा आणि कोणत्यातरी बॉलीवूड च्या गाण्यावर एक एक पाय उचलायचा की झाला dance. मग आपण गणपतीला कोणती गाणी वाजवत आहोत ह्याचा काहीही भान नाही. शीला की जवानी पासून ते मुन्नी अश्या गाण्यावर मुंबईत गणेश विसर्जन होते. लालबाग च्या राजाचा थाट मुंबईत जरी मोठ्ठा असला तरी विसर्जनाची अवस्था तीच. मधूनच मग कोठेतरी मराठमोळी फुगडी घालताना काही बायका व मुली नजरेस पडतात पण एक - दोन फुगड्या झाल्या की परत एक हाताचा dance चालू होतो. मुंबईला एकाच धोरण माहिती आहे, "पैसा फेक, तमाशा देख". मग कोणताही सण असो लाखा लाखांचे फटके उडवायचे, तेवढ्याच किमतीचा गुलाल उधळायचा आणि एक हात वर करून चित्र विचित्र नाचायचे.
ह्या उलट चित्र बघायला मिळत ते पुण्यात. ढोल - ताश्या च्या गजरात गणरायाचं विसर्जन होतं. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी कधी नव्हे ते पुणेकर शिस्ती च पालन करताना मी ह्या ची डोळा ह्याची देही पहिले आहे. गणपती विसर्जनाच्या ढोल पथकाची तालीम एक दीड महिना आधी पासून चालू होते. तालीम करताना ढोलाचे स्वर कानावर पडतात आणि जणू काही ते स्वर गणरायाच्या आगमनाची वरात घेऊन येतात असं वाटते. त्या ढोल ताश्या च पथकाच्या तालामिनेच वातावरण प्रफुल्लीत होऊन जाते.
पुण्याचे ठरलेले ५ मानाच्या गणपतीचे आधी विअर्जन होते. ही पद्धत फार पूर्वी पासून ते आजतागायत चालू आहे. पहिला निघतो तो 'कसबागणपती' -श्री विनायक ठाकर ह्यांचा घराजवळ ही गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी तेथेच त्याची स्थापना केली. पुण्याचा ग्रामदेवता म्हणून ह्या गणपतीचा मन मोठा आहे.
दुसरा मानाचा गणपती म्हणजे 'तांबडी जोगेश्वरी'. आफ्रिकेतल्या हत्ती सारखी दिसणाऱ्या ह्या मूर्तीची मिरवणूक नेहमी चांदीचापालखीतून निघते.